शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सांगलीत भाजप, कॉँग्रेसला स्वकीयांचाच ताप!

By admin | Updated: June 11, 2014 01:04 IST

पक्षांतर्गत गटबाजी : मनसे, आप, बहुजन समाज पक्ष, डाव्या आघाडीसह अन्य पक्षांचीही मैदानात उतरण्याची तयारी

अविनाश कोळी ल्ल सांगलीपक्षांतर्गत गटबाजी, आतापासूनच सुरू झालेल्या कुरघोड्या आणि बहुरंगी लढतीच्या दाट शक्यतेने सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपमधील प्रमुख दावेदारांची डोकेदुखी वाढली आहे. विरोधी उमेदवाराशी लढण्यापूर्वी या दोन्ही पक्षातील इच्छुकांना सुरुवातीला स्वकीयांशीच संघर्ष करावा लागण्याची दाट शक्यता दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. यंदा तो ढासळला, मात्र सांगली विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर येथे आजवर इतर पक्षांनीही यश मिळविल्याचे दिसते. १९६२ नंतर १९८५ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर जनता दल, भाजप व अपक्ष उमेदवारही विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत प्रथमच भाजपचा उमेदवार विजयी झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत. भाजपला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातही खासदार संजय पाटील यांना ४२ हजार ७५६ मतांचे अधिक्य मिळाले आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला गटबाजीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यमान आमदार संभाजी पवार यांनी त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे. त्याचवेळी पवार कुटुंबियांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या बंडाचा दाखला देत पदाधिकाऱ्यांचा एक गट त्यांच्याविरोधात उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी या गटाने ‘फिल्डिंग’ लावली आहे. भाजपच्या इच्छुकांच्या यादीत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सुधीर गाडगीळ, हणमंत पवार यांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटीलही भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. भाजपशी वाढलेली त्यांची सलगीही राष्ट्रवादीच्या चिंतेचा विषय बनली आहे. भाजपकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली, तरी नाराजी व गटबाजीच्या परिणामांशी अधिकृत उमेदवाराचा सामना होणार हे निश्चित. आ. संभाजी पवारांनी पृथ्वीराज यांना उमेदवारी मिळणार हे गृहित धरूनच तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात भेटीही सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडामुळे यंदा उमेदवारी मिळविताना त्यांना कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमध्येही यंदा पक्षांतर्गत नाराजी आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मदन पाटील यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दिगंबर जाधव यांनी मदन पाटील यांच्यावर निष्क्रियतेची टीका केल्याने पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. दुसरीकडे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन इच्छुकांची नावे घेऊन तसा अहवाल प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात येईल, असे सांगून अनेकांच्या स्वप्नांना बळ दिले. लोकसभा निवडणुकीत गटबाजीचा फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीतही याची भीती काँग्रेसला वाटत आहे. सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. मदन पाटील यांच्याकडेच महापालिकेचे नेतृत्व असल्यामुळे त्यांची मदार नगरसेवकांवर अधिक आहे.