शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विद्युत उपकरणे जळाली

By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST

नागरिकांमध्ये भीती : घरावर उच्च दाबाची केबल पडली

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील साई मंदिरजवळील पाच घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत. हा प्रकार शार्टसर्किटने झाला की, अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज (रविवार) सायंकाळी ही घटना घडली.अश्विनकुमार वसंत वरुटे, मिलींद राजाराम जाधव यांच्यासह पाच घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज ही उपकरणे जळाली आहेत. खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. सायंकाळी पाच वाजता अचानक घरातील विद्युत उपकरणातून धूर येत होता. स्फोटासारखा आवाज आल्याने घरातील लोक भितीने बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. तथापि उपकरणे जळून खाक झाली होती. घरात अन्य कोणत्याही साहित्याला आग लागली नव्हती. महावितणचे पथकही दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमनचे जवान निघून गेले. महावितणच्या पथकाने परिसरातील वीज पुरवठा तातडीने बंद केला होता. त्यानंतर पंचनामा करण्यात आला होता. पाच घरात हे प्रकार घडले असले तरी त्यांच्या घराच्या छतावर उच्च दाबाची केबल वायरही पडली होती. रात्री उशिरापर्यंत या केबल वायर काढण्याचे काम सुरु होते. हा प्रकार शॉर्टसर्किटने झाला की, अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले.या परिसरातून टीव्हीची केबल वायर गेली आहे. दुपारी केबल वायर जोडण्याचे काम सुरु होते. त्यावेळी केबल वायरचा स्पर्श मुख्य विजेच्या तारेशी झाल्याने ही घटना घडली असल्याची चर्चा सुरु होती. लोकांच्या घराच्या छतावर केबल वायरही पडली होती.दरम्यान शहर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. ज्यांच्या घरात हे प्रकार घडले, त्यांना तक्रार करणार आहे का? अशी विचारणा केली. तथापि त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. पाचही घरातील विद्युत उपकरणे जळून अंदाचे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)वर्षभरातील चौथी घटना शंभरफुटी रस्त्यावरील लोकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची गेल्या वर्षभरातील ही चौथी घटना आहे. सातत्याने या परिसरातच असे प्रकार घडत आहेत. सहा महिन्यापूर्वी दहा ते बारा घरांतील उपकरणे जळून खाक झाली होती. यामध्ये पाच लाखांचे नुकसान झाले होते. हा प्रकार अतिउच्च दाबाच्या वीजप्रवाहामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र हे प्रकार रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली.