शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

सांगलीत खवा, बर्फीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 15:38 IST

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक ...

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.

सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांचे पथक गुरुवारी मध्यरात्रीपासून सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर येणाºया प्रत्येक एसटी बसवर वॉच करीत बसले होते.

शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिंगोली-कोल्हापूर एसटी आली. या एसटीतून खवा व बर्फीचे पार्सल घेताना हमालांना पकडले. हमालांच्या ताब्यातून पार्सल जप्त केली. एसटी झडती घेतल्यानंतर आणीख मोठ्या प्रमाणात माल सापडला. त्यानंतर पथकाने एसटीच्या पार्सल विभागाची झडती घेतली. तिथेही दोन दिवसापूर्वीही याच एसटीतून खवा व बर्फीची आलेली पार्सल पडून होती. यातील मालही जप्त केला. एकूण पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला.

खवा आणि बर्फीचे एकूण सहा नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.

सांगलीतील प्रज्वल जाधवर, संजय तोरडमल, अमोल जातवर यांच्या दहा व्यवसायिकांनी हा माल मागविला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

जप्त केलेली बर्फी तीन प्रकारची आहे. यामध्ये राधाकृष्ण, राधे व गायत्री अशा नावाने पॅकींग असलेली बर्फी आहे. राधे व गायत्री बर्फीचे गुजरातमध्ये तर राधाकृष्ण बर्फीचे पुण्यात उत्पादन होते. खवाही गुजरातमध्ये उत्पादन झालेला आहे. संबंधित उत्पादकांनाही चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

म्हणून झाली कारवाई

कोडगिरे म्हणाले, दुग्धजन्य पदार्थाची वातानूकुलित वाहनांमधून वाहतूक केली पाहिजे. एसटीतून वाहतूक करणे चुकीचे आहे. हा नाशवंत माल असतो. ग्राहकांना त्याची तशीच विक्री केली तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. उत्पादक व व्यवसायिकांनी याची कोणतीही काळजी न घेता मा मालाची वाहतूक केली आहे. त्यामुळे ही कारवाई केली आहे.