शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सांगलीत खवा, बर्फीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 15:38 IST

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक ...

सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला आहे.

सांगलीत दररोज एसटीतून पार्सलद्वारे खवा व बर्फीची वाहतूक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांचे पथक गुरुवारी मध्यरात्रीपासून सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर येणाºया प्रत्येक एसटी बसवर वॉच करीत बसले होते.

शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिंगोली-कोल्हापूर एसटी आली. या एसटीतून खवा व बर्फीचे पार्सल घेताना हमालांना पकडले. हमालांच्या ताब्यातून पार्सल जप्त केली. एसटी झडती घेतल्यानंतर आणीख मोठ्या प्रमाणात माल सापडला. त्यानंतर पथकाने एसटीच्या पार्सल विभागाची झडती घेतली. तिथेही दोन दिवसापूर्वीही याच एसटीतून खवा व बर्फीची आलेली पार्सल पडून होती. यातील मालही जप्त केला. एकूण पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त केला.

खवा आणि बर्फीचे एकूण सहा नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त शिवानंद कोडगिरे यांनी सांगितले.

सांगलीतील प्रज्वल जाधवर, संजय तोरडमल, अमोल जातवर यांच्या दहा व्यवसायिकांनी हा माल मागविला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

जप्त केलेली बर्फी तीन प्रकारची आहे. यामध्ये राधाकृष्ण, राधे व गायत्री अशा नावाने पॅकींग असलेली बर्फी आहे. राधे व गायत्री बर्फीचे गुजरातमध्ये तर राधाकृष्ण बर्फीचे पुण्यात उत्पादन होते. खवाही गुजरातमध्ये उत्पादन झालेला आहे. संबंधित उत्पादकांनाही चौकशीसाठी बोलविले जाणार असल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

म्हणून झाली कारवाई

कोडगिरे म्हणाले, दुग्धजन्य पदार्थाची वातानूकुलित वाहनांमधून वाहतूक केली पाहिजे. एसटीतून वाहतूक करणे चुकीचे आहे. हा नाशवंत माल असतो. ग्राहकांना त्याची तशीच विक्री केली तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. उत्पादक व व्यवसायिकांनी याची कोणतीही काळजी न घेता मा मालाची वाहतूक केली आहे. त्यामुळे ही कारवाई केली आहे.