शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मिरज पॅटर्नविरुद्ध सांगलीकरांचा एल्गार

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

विकासासाठी एकत्र : वीस सर्वपक्षीय नगरसेवकांचा गट सरसावला

सांगली : महापालिकेतील मिरजकर नगरसेवकांचा वरचष्मा कमी करण्यासाठी सांगलीतील नगरसेवक सरसावले आहेत. सांगली व कुपवाडमधील वीस सर्वपक्षीय नगरसेवकांनी यापुढे विकास कामांसाठी दबावगट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज पॅटर्नच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीचा निधी पळविणाऱ्यांना या गटाकडून शह दिला जाणार आहे. सध्या तरी ही चर्चा प्राथमिक पातळीवर असली तरी, तिला लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, असे दिसते. महापालिकेच्या स्थापनेपासून गेली सोळा वर्षे मिरजेतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी नेहमीच सत्ताधारी नेत्यांवर दबाव ठेवला होता. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, मिरजकरांचीच चलती असायची. मग जयंत पाटील असो अथवा मदन पाटील असो, या नेत्यांना सत्तेची गणिते जुळविताना नेहमीच मिरजकरांना झुकते माप द्यावे लागले आहे. ‘मिरज पॅटर्न’ या गोंडस नावाखाली नगरसेवकांनी नेत्यांवर वरचष्मा गाजविला आहे. विकास कामाचा निधी जास्तीत जास्त मिरजेत खर्च व्हावा, यासाठी हे सदस्य आक्रमक असतात. त्यातच पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्याने, समीकरणेच बदलणार आहेत. पालिकेच्या कारभारात त्यांचा शब्द अंतिम होता. पण आता दबदबाच संपल्याने सांगलीकरांना कोण वाली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विचारविनियम सुरू केला आहे. शहरातील विविध विकासकामे, शासकीय योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर दबाव असावा, असा सूर उमटत आहे. त्यासाठी सर्वपक्षीय वीस नगरसेवकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी यापुढे काम करण्याचा निर्धार केला जात आहे. या दबाव गटात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक आहेत. सध्या या दबाव गटाची निर्मिती चर्चेच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. लवकरच तिला मूर्त स्वरुप देण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते, हे भविष्यातच कळेल. (प्रतिनिधी)धास्ती कायम : टिकाव लागणार का?सांगली, कुपवाडच्या नगरसेवकांनी जरी एकत्रित गट केला तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता ते पुन्हा मिरजकरांच्या अधिपत्याखाली जाऊ शकतात. त्यामागे अर्थपूर्ण तडजोडी हे प्रमुख कारण आहे. आतापर्यंत महापालिकेचा राजकारणात या घडामोडी घडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता सांगलीकरांनी बाह्या सरसावल्या असला तरी त्यांचा टिकाव लागणार का? ते किती काळ एकत्र राहणार, हाच खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे.