शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शिव स्मारकासाठी सांगलीतून माती, जलकलश रवाना

By admin | Updated: December 22, 2016 23:35 IST

मुंबईत मिरवणूक : भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवप्रेमींना निमंत्रण

सांगली : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिव स्मारकासाठी सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि नद्यांचे जल कलशांमध्ये भरून रवाना झाले. येथील शिवाजी पुतळ्याजवळ या कलशांचे पूजन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सांगलीत गुरुवारी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातून आलेले माती व जलकलश एकत्र करण्यात आले. जवळपास १२ कलशांमध्ये जल आणि १२ कलशांमध्ये माती घेऊन प्रत्येक तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक आले होते. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे जल नंतर एका कलशात, तर सर्व माती दुसऱ्या कलशात एकत्रित करण्यात आली. हे दोन्ही कलश शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. मकरंद देशपांडे या संकल्पनेविषयी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शिवरायांनी पदस्पर्शाने इतिहास घडविला आहे. अशा सर्व ऐतिहासिक स्थळांवरील माती आणि नद्यांचे पाणी मुंबईतील शिव स्मारकाच्या भूमिपूजनासाठी वापरण्यात येणार आहे. हा सोहळा प्रत्येक शिवप्रेमींनी अनुभवायला हवा. भाजप, शिवप्रतिष्ठान, शिवसेना व अन्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कलश पूजनासाठी उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देत हे दोन्ही कलश सदाभाऊ खोत व संजयकाका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या एका जीपमध्ये कलश ठेवण्यात आले. भगवे ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हे कलश मुंबईला रवाना झाले. मुंबईतील चेंबूर येथे शुक्रवारी, २३ डिसेंबरला सकाळी हे कलश दाखल होतील. तेथून विविध ठिकाणांहून आलेल्या कलशांची एकत्रित मिरवणूक गेट वे आॅफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जातील. २४ डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यात हे कलश पुन्हा एकत्रित केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय, शिवप्रेमी नेते, कार्यकर्ते या सोहळ्यासाठी जाणार आहेत.(प्रतिनिधी)येथून आले माती, जलकलश...आटपाडीतून माणगंगा, कडेगावमधील येरळा, पलूस, मिरज, वाळवा येथील कृष्णा आणि वारणा, शिराळ्यातून तोरणा, मोरणा, भोगावती, तीळगंगा, जतमधील बोर अशा नद्यांचे जल कलशांमधून आणले होते. आटपाडी तालुक्यातील बाणूरगड, मिरजेतील भुईकोट किल्ला, वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड, शिराळा तालुक्यातील प्रचितगड, भुईकोट किल्ला, बहाद्दूरवाडी येथील अंबाबाई मंदिर, जत तालुक्यातील प्रतापराव गुजर समाधीस्थळ येथील माती कलशांमधून भरुन आणण्यात आली होती.