शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शिव स्मारकासाठी सांगलीतून माती, जलकलश रवाना

By admin | Updated: December 22, 2016 23:35 IST

मुंबईत मिरवणूक : भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवप्रेमींना निमंत्रण

सांगली : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिव स्मारकासाठी सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि नद्यांचे जल कलशांमध्ये भरून रवाना झाले. येथील शिवाजी पुतळ्याजवळ या कलशांचे पूजन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सांगलीत गुरुवारी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातून आलेले माती व जलकलश एकत्र करण्यात आले. जवळपास १२ कलशांमध्ये जल आणि १२ कलशांमध्ये माती घेऊन प्रत्येक तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक आले होते. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे जल नंतर एका कलशात, तर सर्व माती दुसऱ्या कलशात एकत्रित करण्यात आली. हे दोन्ही कलश शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. मकरंद देशपांडे या संकल्पनेविषयी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शिवरायांनी पदस्पर्शाने इतिहास घडविला आहे. अशा सर्व ऐतिहासिक स्थळांवरील माती आणि नद्यांचे पाणी मुंबईतील शिव स्मारकाच्या भूमिपूजनासाठी वापरण्यात येणार आहे. हा सोहळा प्रत्येक शिवप्रेमींनी अनुभवायला हवा. भाजप, शिवप्रतिष्ठान, शिवसेना व अन्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कलश पूजनासाठी उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देत हे दोन्ही कलश सदाभाऊ खोत व संजयकाका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या एका जीपमध्ये कलश ठेवण्यात आले. भगवे ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हे कलश मुंबईला रवाना झाले. मुंबईतील चेंबूर येथे शुक्रवारी, २३ डिसेंबरला सकाळी हे कलश दाखल होतील. तेथून विविध ठिकाणांहून आलेल्या कलशांची एकत्रित मिरवणूक गेट वे आॅफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जातील. २४ डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यात हे कलश पुन्हा एकत्रित केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय, शिवप्रेमी नेते, कार्यकर्ते या सोहळ्यासाठी जाणार आहेत.(प्रतिनिधी)येथून आले माती, जलकलश...आटपाडीतून माणगंगा, कडेगावमधील येरळा, पलूस, मिरज, वाळवा येथील कृष्णा आणि वारणा, शिराळ्यातून तोरणा, मोरणा, भोगावती, तीळगंगा, जतमधील बोर अशा नद्यांचे जल कलशांमधून आणले होते. आटपाडी तालुक्यातील बाणूरगड, मिरजेतील भुईकोट किल्ला, वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड, शिराळा तालुक्यातील प्रचितगड, भुईकोट किल्ला, बहाद्दूरवाडी येथील अंबाबाई मंदिर, जत तालुक्यातील प्रतापराव गुजर समाधीस्थळ येथील माती कलशांमधून भरुन आणण्यात आली होती.