शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सांगलीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान ...

सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चातर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी सांगलीतील स्टेशन चौकात शनिवारी धरणे आंदोलन केले.

यावेळी हमाल पंचायतीचे विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, कॉ. सुमन पुजारी, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. शंकर पुजारी, ॲड. के. डी. शिंदे, भाई ॲड. सुभाष पाटील, कॉ. धनाजी गुरव, बाळासाहेब पाटील, ॲड. कृष्णा पाटील, कॉ. सुधीर नलवडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

डॉ. गुरव म्हणाले की, महात्मा गांधी यांची आजच्या दिवशी जातीयवादी शक्तीने हत्या केली होती. याच विचाराचे सध्या केंद्रातील सरकार असल्यामुळे ते शेतकरी आणि कामगारविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धरणे आंदोलन करीत आहोत. शेतकऱ्यांचे शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे हे षङ्‌यंत्र सत्ताधाऱ्यांचे आहे. यामुळे शेतकरी बदनाम होणार नाही आणि आंदोलनही मागे घेणार नाही. जोपर्यंत शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत.

कॉ. शंकर पुजारी म्हणाले, आंदोलने मोडीत काढण्यापेक्षा केंद्राने शेतकऱ्यांना त्रासदायी असणारे तीन कायदे मागे घेण्याची गरज आहे, पण हट्टी सरकार ते कायदे मागे घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात समाधानी मानत आहे.