शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सांगली-पेठ रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेठ-सांगली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत दोन वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा आराखडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पेठ-सांगली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत दोन वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून तो केंद्र शासनाला सादर केला गेला; पण आता या फायलीवर धूळ साचली आहे. त्यात चौपदरीकरणाच्या कामाचे बजेटही १०० कोटींने वाढले आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रस्त्याचा समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

वाहनांची गर्दी, अपघाताचे प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी कृती समितीही स्थापन केली. या समितीच्यावतीने आंदोलनही छेडण्यात आले. त्यानंतर काही प्रमाणात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली; पण काही दिवसांतच पुन्हा रस्ता उखडला गेला. आजही या रस्त्यावर हातभर खड्डे पडले आहेत. अपघाताच्या घटना तर दररोजच्या झाल्या आहेत.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचा घोळही वर्षभर सुरू होता. नुकतेच त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. दोन वर्षापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने रस्ता चौपदरीकरणासाठी ५४३ कोटींचा आराखडा तयार केला. यात संपूर्ण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबरोबरच दुभाजक, आवश्यक तिथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारींचा समावेश केला गेला. जिथे दुपदरी रस्ता आहे, तिथे १० मीटरने रस्ता करण्याचेही नियोजन करण्यात आले. केंद्र शासनाने अद्याप या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे आराखडा धूळ खात पडला आहे. त्यात गेल्या दोन वर्षात रस्त्याच्या बजेटमध्ये १०० कोटींची वाढ झाली आहे. आता रस्त्यासाठी ६५० कोटींची गरज भासणार आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात या रस्त्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या घोषणा हवेत

तीन वर्षांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी या रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी १२०० कोटी मंजूर झाल्याचेही सांगितले. नागज येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कामाचे औपचारिक उद्घाटनही उरकण्यात आले; पण अद्याप या रस्त्याच्या कामालाच मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.