शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

सांगली-पेठ रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेठ-सांगली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत दोन वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा आराखडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पेठ-सांगली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत दोन वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून तो केंद्र शासनाला सादर केला गेला; पण आता या फायलीवर धूळ साचली आहे. त्यात चौपदरीकरणाच्या कामाचे बजेटही १०० कोटींने वाढले आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रस्त्याचा समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

वाहनांची गर्दी, अपघाताचे प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी कृती समितीही स्थापन केली. या समितीच्यावतीने आंदोलनही छेडण्यात आले. त्यानंतर काही प्रमाणात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली; पण काही दिवसांतच पुन्हा रस्ता उखडला गेला. आजही या रस्त्यावर हातभर खड्डे पडले आहेत. अपघाताच्या घटना तर दररोजच्या झाल्या आहेत.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचा घोळही वर्षभर सुरू होता. नुकतेच त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. दोन वर्षापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने रस्ता चौपदरीकरणासाठी ५४३ कोटींचा आराखडा तयार केला. यात संपूर्ण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबरोबरच दुभाजक, आवश्यक तिथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारींचा समावेश केला गेला. जिथे दुपदरी रस्ता आहे, तिथे १० मीटरने रस्ता करण्याचेही नियोजन करण्यात आले. केंद्र शासनाने अद्याप या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे आराखडा धूळ खात पडला आहे. त्यात गेल्या दोन वर्षात रस्त्याच्या बजेटमध्ये १०० कोटींची वाढ झाली आहे. आता रस्त्यासाठी ६५० कोटींची गरज भासणार आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात या रस्त्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या घोषणा हवेत

तीन वर्षांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी या रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी १२०० कोटी मंजूर झाल्याचेही सांगितले. नागज येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कामाचे औपचारिक उद्घाटनही उरकण्यात आले; पण अद्याप या रस्त्याच्या कामालाच मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.