शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सांगली, संखसाठी अप्पर ‘तहसील’चा प्रस्ताव सादर

By admin | Updated: July 18, 2016 23:42 IST

तालुका विभाजनास बगल : शासन निर्णयाकडे लक्ष

शरद जाधव-- सांगली --वाढलेली लोकसंख्या, प्रशासकीय ताण व यामुळे झालेली जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र सांगली तालुका व जत तालुक्याच्या विभाजनाचे शासनदरबारी भिजत घोंगडे कायमच आहे. जनतेच्या व प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने दोन्ही ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून, यावर शासन काय निर्णय घेते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठकीत या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने विभाजनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ जिल्ह्यातील जत तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा चर्चेला येतो आहे. तीच स्थिती सांगलीची असून, राज्यभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तालुका झाला असला तरी, सांगलीतील या दोन तालुक्याच्या मागणीनंतर पलूस व कडेगाव तालुक्यांची निर्मिती झाली मात्र, ना जत तालुक्याचे विभाजन झाले, ना मिरज तालुक्यातून सांगलीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. या साऱ्या प्रशासकीय अडचणीत भागातील वाढलेली लोक संख्या, प्रशासनाची होत असलेली कसरत आणि जनतेचीही गैरसोय वाढत चालली आहे. नवीन तालुका निर्मितीसाठी कायदेशीर स्वरूप असल्याने व त्या मंजुरीस मोठा कालावधी जात असल्याने व महत्त्वाचे म्हणजे तालुका निर्मितीसाठी मोठा खर्च होत असल्याने राज्य शासनाने या निर्णयाला बगल दिली आहे. त्यामुळेच याला पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सांगली व जत तालुक्यात संख येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. दोन्ही प्रस्तावावर आता शासनाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. नियोजित सांगली व संख अप्पर तहसील कार्यालयासाठी ४ नायब तहसीलदार, ३ अव्वल कारकुन, १० लिपिक, ५ शिपाई आणि १ वाहनचालक अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव, कार्यालयासाठीच्या जागेचा उताऱ्यासह सादर करण्यात आला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित असून, पाठपुरावा केल्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर खोत यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने या दोन्ही ठिकाणी अप्पर तहसीलदारांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.