शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, संखसाठी अप्पर ‘तहसील’चा प्रस्ताव सादर

By admin | Updated: July 18, 2016 23:42 IST

तालुका विभाजनास बगल : शासन निर्णयाकडे लक्ष

शरद जाधव-- सांगली --वाढलेली लोकसंख्या, प्रशासकीय ताण व यामुळे झालेली जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र सांगली तालुका व जत तालुक्याच्या विभाजनाचे शासनदरबारी भिजत घोंगडे कायमच आहे. जनतेच्या व प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने दोन्ही ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून, यावर शासन काय निर्णय घेते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठकीत या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने विभाजनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ जिल्ह्यातील जत तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा चर्चेला येतो आहे. तीच स्थिती सांगलीची असून, राज्यभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तालुका झाला असला तरी, सांगलीतील या दोन तालुक्याच्या मागणीनंतर पलूस व कडेगाव तालुक्यांची निर्मिती झाली मात्र, ना जत तालुक्याचे विभाजन झाले, ना मिरज तालुक्यातून सांगलीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. या साऱ्या प्रशासकीय अडचणीत भागातील वाढलेली लोक संख्या, प्रशासनाची होत असलेली कसरत आणि जनतेचीही गैरसोय वाढत चालली आहे. नवीन तालुका निर्मितीसाठी कायदेशीर स्वरूप असल्याने व त्या मंजुरीस मोठा कालावधी जात असल्याने व महत्त्वाचे म्हणजे तालुका निर्मितीसाठी मोठा खर्च होत असल्याने राज्य शासनाने या निर्णयाला बगल दिली आहे. त्यामुळेच याला पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सांगली व जत तालुक्यात संख येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. दोन्ही प्रस्तावावर आता शासनाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. नियोजित सांगली व संख अप्पर तहसील कार्यालयासाठी ४ नायब तहसीलदार, ३ अव्वल कारकुन, १० लिपिक, ५ शिपाई आणि १ वाहनचालक अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव, कार्यालयासाठीच्या जागेचा उताऱ्यासह सादर करण्यात आला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित असून, पाठपुरावा केल्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर खोत यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने या दोन्ही ठिकाणी अप्पर तहसीलदारांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.