शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त-- केंद्र शासनाकडून घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:49 IST

सांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे.

ठळक मुद्दे आणखी एक मानाचा तुरा; विविध प्रकल्पांसाठी निधीचा मार्ग मोकळागेल्या आठवडाभरात ६८ जणांवर अशी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंडवैयक्तिक शौचालये बांधण्याकडे नागरिकांचा कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, केंद्र शासनाकडून विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमावर केंद्र शासनानेही शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय समितीने सांगली महापालिकेची पाहणी करून हागणदारीमुक्त शहराची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने केंद्र शासनाकडेही शिफारस केली. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय समितीचे रवी रंजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महापालिकेची पाहणी करून अहवाल शासनाला सादर केला होता. शुक्रवारी केंद्र शासनाकडून हागणदारीमुक्त शहरात सांगली महापालिकेचा समावेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.

वैयक्तिक शौचालय योजनेलाही गती देण्यात आली. महापालिकेने ४३६६ अर्जाना मंजुरी दिली होती. त्यापैकी ३ हजार ५८८ शौचालयांचे बांधकाम सुरू होते, तर ३ हजार १९९ शौचालये पूर्ण झाली होती. शौचालयांच्या लाभार्थ्यांना ४ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे. शौचालय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून १२ हजाराचे अनुदान मिळत होते, तर महापौर हारूण शिकलगार यांनी महापालिकेच्यावतीने आणखी ५ हजाराच्या अनुदानाची घोषणा केली होती. त्यामुळे वैयक्तिक शौचालये बांधण्याकडे नागरिकांचा कल वाढला होता.जनजागृतीबरोबरच कारवाईचा बडगा...प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना, तसेच उघड्यावर शौचास जाणाºयांविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने निर्धारित वेळेत हागणदारीमुक्तीचे ध्येय गाठले आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून हागणदारीमुक्त शहरासाठी पाठपुरावा सुरू केला होता. उपायुक्त सुनील पवार व आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचाºयांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.सई ताम्हणकर स्वच्छतादूत...स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने स्वच्छता दूत म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड केली होती. सई ताम्हणकर हिने तीन दिवस शहराच्या विविध भागात जाऊन स्वच्छतेबाबत जागृती केली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रभागनिहाय गुडमॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. गेल्या आठवडाभरात ६८ जणांवर अशी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंडही वसूल केला.