शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘लोक’जागर: सांगलीची नाट्यपंढरीकडून सांस्कृतिक राजधानी होण्याकडे वाटचाल

By हणमंत पाटील | Updated: January 1, 2024 16:44 IST

हणमंत पाटील सांगलीला दीडशे ते दोनशे वर्षांची नाटक, साहित्य, कला, संगीत व सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. १८४३ साली विष्णुदास ...

हणमंत पाटीलसांगलीला दीडशे ते दोनशे वर्षांची नाटक, साहित्य, कला, संगीत व सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ हे पहिले नाटक येथे सादर केल्याने नाट्यपंढरी म्हणून सांगलीला ओळखले जाऊ लागले. ही परंपरा आजही सांगलीतील नाट्यकलावंत, श्रोते व रसिकांनी जपली आहे. त्यामुळेच नवीन वर्षांत जानेवारी २०२४ ला होणाऱ्या १०० व्या मराठी नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा २९ डिसेंबरला नाट्यपंढरीत झाला. ही प्रत्येक सांगलीकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, इथल्या राजकीय इच्छाशक्तीअभावी हे संमेलन पुण्यातील नेत्यांनी तिकडे नेले, हे वास्तव नाकारता येणार नाही.राज्याची सांस्कृतिक राजधानी हे बिरूद घेऊन वावरणाऱ्या पुण्याचा विकासाची वाटचाल झपाट्याने महानगराकडे सुरू आहे. तसे त्यांचे सांस्कृतिकपण हरवत चालले आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे, वाढविण्याचे व संवर्धनाचे प्रयत्न गावागावांत आजही सुरू आहेत. त्यामुळेच नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ सोहळ्यासाठी आलेले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी व चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगलीतील सांस्कृतिक परंपरेचे व रसिक श्रोत्यांचे कौतुक केले.

सांगलीतील सांस्कृतिक परंपरा जपण्याचे मुख्य श्रेय इथल्या रसिक, श्रोते व साहित्य वाचकांचे आहे. त्यांच्यामुळेच इथली नाट्य, संगीत, साहित्य व कला अजूनही जिवंत आहे.विष्णुदास भावे, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, नटसम्राट बालगंधर्व यांनी सांगलीत नाट्यपरंपरेची भक्कम पायाभरणी केली. ही नाट्यपरंपरा व चळवळ आजही विविध संस्था व संघटनांनी पुढे चालू ठेवली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व मास्टर अविनाश यांनी संगीत रंगभूमी गाजविण्यास सांगलीतून सुरुवात केली. ही संगीत परंपरा गानसम्राज्ञी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी जगभर पोहोचविली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर, कविवर्य ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, कवी सुधांशू, म. भा. भोसले व चारुतासागर यांनी साहित्यक्षेत्रात सांगलीचे नाव मोठे केले. साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची ही परंपरा ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. तारा भवाळकर व वसंत केशव पाटील यांनी कायम ठेवली आहे.म्हणूनच सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, भिलवडी, औदुंबर, शिराळा, कामेरी, इस्लामपूर, विटा, रेणावी, बलवडी, आटपाडी, कवठेएंकद, देशिंग, कवठेमहांकाळ, मिरज, कुपवाड व सांगली शहरांतील विविध संस्था साहित्य संमेलन, कीर्तन महोत्सव, व्याख्यानमाला, नाट्य, एकांकिका, अभिवाचन व वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेतात. त्यासाठी कुंडलचा साखर कारखाना, महापालिका, सांगली अर्बन बँक, कर्मवीर पतसंस्था, शाळा-कॉलेज, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था, वाचनालये व युवक मंडळीही आयोजनासाठी पुढाकार घेतात. त्यासाठी चितळे डेअरी, पु. ना. गाडगीळ पेढीसारखे व्यावसायिक व उद्योजक आर्थिक भार उचलण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यामुळेच नाट्यपंढरीची वाटचाल सांस्कृतिक राजधानीकडे जोमाने सुरू आहे. त्याला राजकीय पाठबळाची व इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

टॅग्स :Sangliसांगली