शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली-मिरजेत महापालिका शाळा सलाईनवर

By admin | Updated: January 4, 2016 00:32 IST

विद्यार्थी संख्येत मोठी घट : इंग्रजी शाळांच्या स्पर्धेमुळे वाताहत; दर्जा सुधारण्याचे आव्हान

सदानंद औंधे --मिरज --महापालिकेच्या सांगली-मिरजेतील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असून, विद्यार्थी नसल्याने अनेक शाळा बंद पडत आहेत. बंद शाळांच्या इमारतींचा अन्य कारणांसाठी वापर करण्याचा नगरसेवकांचा आग्रह आहे. यामुळे महापालिका शाळा आणखी काही वर्षात इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.महापालिकेच्या सांगलीत ३० व मिरजेत २२ मराठी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. १० वर्षांपूर्वी महापालिका प्राथमिक शाळांत सुमारे १२ हजार विद्यार्थी होते. सध्या ५२ शाळेत केवळ ५५०० विद्यार्थी आहेत. दरवर्षी विद्यार्थी संख्येत घट होत असल्याने महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी काही शाळांत केवळ २५ ते ५० एवढेच विद्यार्थी आहेत. १० वर्षांपूर्वी महापालिकेकडे सुमारे पाचशे शिक्षक होते. विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षकांची संख्याही १६० वर आली आहे. महापालिका शाळांत गेल्या काही वर्षात शिक्षकांच्या ८० जागा रिक्त होत्या. मात्र विद्यार्थी कमी होत असल्याने रिक्त जागांची संख्या ४० वर आली आहे. येत्या काही वर्षात सध्या असलेले शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. मिरजेपेक्षा सांगलीत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या आणखीनच कमी आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा व महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा, साधनांची कमतरता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. खासगी शाळा व इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत महापालिका शाळांची वाताहत झाली आहे. विद्यार्थी नसल्याने मिरजेत पाच शाळा बंद पडल्या आहेत. उर्वरित अनेक शाळा सलाईनवर असल्याचे चित्र आहे. बंद पडलेल्या शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, या शाळा इमारतीचा अन्य कारणांसाठी वापर करण्याची मागणी नगरसेवक करीत आहेत. कमानवेस येथील महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून, या शाळेच्या इमारतीत समाज मंदिर सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. कुपवाड रस्त्यावर शाळा क्रमांक २४ बंद पडल्यानंतर तेथे गांधी चौक पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही शाळा इमारतींचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर सुरू करण्याची मागणी आहे. शाळा इमारतीचा वेगळा कारणासाठी वापराचा निर्णय झाल्यास महापालिका प्राथमिक शाळा इतिहासजमा होणार आहेत.शैक्षणिक दर्जावर परिणामइंग्रजी शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी महापालिका शाळेत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण सुरू केल्यास विद्यार्थ्यांची गळती रोखता येणे शक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांकडे साधने व सुविधांची कमतरता आहे. शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे केंद्रप्रमुख या पदाप्रमाणे महापालिका शिक्षण मंडळाकडे प्रशासन अधिकाऱ्यांशिवाय शिक्षकांवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी नाही. केंद्र समन्वयक ही प्रतिनियुक्तीवरील पदे रद्द करण्यात आली आहेत. त्यांचाही शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे. शिक्षकांच्या विनवण्या : पालकांची नकारघंटासध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला बालवाडी प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांऐवजी नामवंत खासगी शाळांत प्रवेशासाठी रस्सीखेच आहे. मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पालकांची अधिक पसंती असल्याने देणग्या देऊनही इंग्रजी शाळांत प्रवेश घेण्यात येत आहे. मिरजेत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांतील बालवाडी प्रवेश क्षमता सुमारे बाराशेवर आहे. मात्र इंग्रजी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट आहे. तसेच महापालिका शाळांतील शिक्षक बालवाडी प्रवेशासाठी पालकांना विनवणी करीत आहेत.