शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

सांगली-मिरजेत डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्या टोळ्या फोफावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाकाळात कार्यरत डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा नवा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. तथाकथित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, फुटकळ ...

सांगली : कोरोनाकाळात कार्यरत डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा नवा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. तथाकथित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, फुटकळ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची माया यातून जमवली आहे. काही खंडणीबहाद्दरांना पोलिसांचे व प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळत आहे.

पहिल्या लाटेचा चांगल्या उत्पन्नाचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेत अनेक कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स उभारण्यात आली. जिल्हा प्रशासनाने याकामी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, मात्र आता खंडणीबहाद्दर टोळ्यांमुळे त्याला गालबोट लागत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण करुन त्यांना लढाईतून बाजूला काढले जात आहे. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनासह शासनाला पत्र पाठवून रुग्णसेवेतून बाहेर पडण्याची व भविष्यात सहभागी न होण्याची भूमिका मांडली आहे.

सध्या काही मोजक्या डॉक्टरांच्या कृष्णकृत्यानंतर सर्वच डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. यात बदनामीच्या भीतीने अनेक डॉक्टर खंडणीबहाद्दरांच्या कारस्थानाला बळी पडले आहेत. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. या टोळ्यांना रोखले नाही तर भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटेमध्ये वैद्यकीय यंत्रणा उभारणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी खंडणीखाेरांवर कारवाई करुन असे प्रकार घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोट

एखाद्या डॉक्टरच्या कृत्यानंतर सर्वांना त्याच तराजूत तोलण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांना काम करणे मुश्कील झाले आहे. बिलांसाठी त्रास देणारी, पैसे मागणारी विकृती वाढत आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर व त्यांची मुले या व्यवसायापासून दूर होण्याच्या मानसिकतेत आहेत. ही बाब जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच समाजासाठी चांगली नाही.

- डॉ. माधवी पटवर्धन, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगली

चौकट

पोलीस, अधिकाऱ्यांचेही पाठबळ

सांगली, मिरजेत काही भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व पोलिसांकडूनही या खंडणीबहाद्दरांना बळ मिळत आहे. त्यामुळे अशा लाेकांचे फावले आहे. प्रशासन, लेखापरीक्षक व पोलिसांकडे तक्रारी करून टोळ्यांकडून दबाव टाकला जात आहे.

चौकट

उपद्रव नको म्हणून...

मिरजेत तीन डॉक्टरांना पोलीस ठाण्यात बोलावून निनावी तक्रारीबद्दल जाब विचारण्याचा प्रकारही घडला आहे. लेखापरीक्षकांकडून आलेल्या तक्रारींचे भय दाखवले जात असल्याने उपद्रव नको म्हणून डॉक्टरांकडून अशा तक्रारदारांना पैसे दिले जात आहेत.