शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सांगली-मिरजेत डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्या टोळ्या फोफावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाकाळात कार्यरत डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा नवा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. तथाकथित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, फुटकळ ...

सांगली : कोरोनाकाळात कार्यरत डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा नवा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. तथाकथित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, फुटकळ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची माया यातून जमवली आहे. काही खंडणीबहाद्दरांना पोलिसांचे व प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळत आहे.

पहिल्या लाटेचा चांगल्या उत्पन्नाचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेत अनेक कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स उभारण्यात आली. जिल्हा प्रशासनाने याकामी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, मात्र आता खंडणीबहाद्दर टोळ्यांमुळे त्याला गालबोट लागत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण करुन त्यांना लढाईतून बाजूला काढले जात आहे. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनासह शासनाला पत्र पाठवून रुग्णसेवेतून बाहेर पडण्याची व भविष्यात सहभागी न होण्याची भूमिका मांडली आहे.

सध्या काही मोजक्या डॉक्टरांच्या कृष्णकृत्यानंतर सर्वच डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. यात बदनामीच्या भीतीने अनेक डॉक्टर खंडणीबहाद्दरांच्या कारस्थानाला बळी पडले आहेत. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. या टोळ्यांना रोखले नाही तर भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटेमध्ये वैद्यकीय यंत्रणा उभारणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी खंडणीखाेरांवर कारवाई करुन असे प्रकार घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोट

एखाद्या डॉक्टरच्या कृत्यानंतर सर्वांना त्याच तराजूत तोलण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांना काम करणे मुश्कील झाले आहे. बिलांसाठी त्रास देणारी, पैसे मागणारी विकृती वाढत आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर व त्यांची मुले या व्यवसायापासून दूर होण्याच्या मानसिकतेत आहेत. ही बाब जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच समाजासाठी चांगली नाही.

- डॉ. माधवी पटवर्धन, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगली

चौकट

पोलीस, अधिकाऱ्यांचेही पाठबळ

सांगली, मिरजेत काही भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व पोलिसांकडूनही या खंडणीबहाद्दरांना बळ मिळत आहे. त्यामुळे अशा लाेकांचे फावले आहे. प्रशासन, लेखापरीक्षक व पोलिसांकडे तक्रारी करून टोळ्यांकडून दबाव टाकला जात आहे.

चौकट

उपद्रव नको म्हणून...

मिरजेत तीन डॉक्टरांना पोलीस ठाण्यात बोलावून निनावी तक्रारीबद्दल जाब विचारण्याचा प्रकारही घडला आहे. लेखापरीक्षकांकडून आलेल्या तक्रारींचे भय दाखवले जात असल्याने उपद्रव नको म्हणून डॉक्टरांकडून अशा तक्रारदारांना पैसे दिले जात आहेत.