शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ऐतिहासिक मोर्चासाठी सांगली ‘मराठा’मय

By admin | Updated: September 25, 2016 23:50 IST

तयारी अंतिम टप्प्यात : पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते राबताहेत; मराठा क्रांती मोर्चाचा गजर

सांगली : मंगळवार, दि. २७ सप्टेंबरला सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चाला अवघे दोन दिवस उरल्याने, जिल्ह्यात सर्वत्र नियोजनाच्या बैठकांनी वेग घेतला आहे. या विराट मोर्चासाठी सर्व भागातून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी महिला प्रतिनिधी, स्वयंसेवकांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. सांगलीतील मोर्चाच्या नियोजनावर प्रशासनही लक्ष ठेवून असून, प्रशासकीय पातळीवरही स्वच्छता, पाण्याची सोय, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकांनी गेला पंधरवडा अक्षरश: ढवळून निघाला आहे. जिल्हा संपर्क कार्यालयाबरोबरच तालुका आणि गावपातळीवरही बैठका, वाहनांची सोय, त्यांच्या अल्पोपहाराची सोय आदींचे नियोजन करण्यात येत आहे. मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. सध्या या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, या मार्गावरील वाहने, रूग्णवाहिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. रविवारी दिवसभर राम मंदिर चौक ते कॉँग्रेस भवन चौक, राम मंदिर चौक ते पुष्पराज चौक या रस्त्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचे काम पूर्ण करून सायंकाळी याची चाचणी घेण्यात आली. पुष्पराज चौक ते मार्केट यार्ड व विश्रामबागपर्यंत ही सोय करण्यात येणार आहे. विक्रमी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे. रविवारी दिवसभर पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी करून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सायंकाळी महापौर हारूण शिकलगार यांनीही संपर्क कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. (प्रतिनिधी) मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून सकाळी ११ वाजता होणार आहे. मोर्चात अग्रभागी मुली असणार असून, त्यानंतर महाविद्यालयीन तरूणी, महिला असा क्रम आहे. निवडलेल्या पाच मुली शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असून, नंतर त्या मोर्चात सहभागी होणार आहेत. तीन ठिकाणी हेलिकॅमची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.