शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सांगली भूविकास बँका ‘सलाईन’वर...

By admin | Updated: August 18, 2014 23:25 IST

कर्मचारी चिंतेत : शासनविरोधात आंदोलनाची तयारी

अविनाश कोळी - सांगली --राज्यातील भूविकास बॅँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्यातील सक्षम व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सर्वच बॅँका ‘सलाईन’वर आहेत. समितीच्या सकारात्मक शिफारसींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जागृत झालेली आशा आता निराशेत रूपांतरित झाली आहे. त्यामुळे शासनविरोधी आंदोलनाची तयारी कर्मचारी संघटनेने सुरू केली आहे. राज्यातील भूविकास बँकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्यातील या बँकांबाबत दोनवेळा अभ्यास समिती नियुक्त झाली. पहिल्या समितीने दिलेल्या शिफारसी या बँकांसाठी सकारात्मक नव्हत्या. त्यामुळे त्या अहवालाविरुद्ध कर्मचाऱ्यांची नाराजी होती. त्यामुळे दुसरी अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने सहकार विभाग व राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. सध्याच्या अहवालाबाबत संघटना सकारात्मक आहे. समितीतही संघटनेला स्थान देण्यात आले होते. त्यामुळे समितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.  यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत पुनरुज्जीवनाबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील भूविकास बॅँकांना पुन्हा ‘सलाईन’वर ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाने नाबार्डला शिखर बँकेच्यावतीने ७२७ कोटी ६३ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी हमी दिली होती. कर्ज, त्यावरील व्याज, जादा व्याज किंवा त्यावरील शुल्क याच्या परतफेडीसाठीची ही हमी होती. शासनास शिखर बँकेने देय असलेल्या रकमांची गोळाबेरीज १ हजार ७९७ इतकी नमूद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूस शिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता, जिंदगी, दायित्व अशा सर्व गोष्टींची गोळाबेरीज १२९९ रुपये इतकी होते. शासनकर्ज भागविण्यासाठी ४९१ कोटी रुपये कमी पडत आहेत. कर्मचारी संघटनेने एकरकमी परतफेड योजनेबद्दल एक मुद्दा मांडला आहे. राज्य शासनाने नाबार्डकडून एकरकमी परतफेड योजना घेताना बँकेस सहभागी करून घेतले नाही. शासनाने नाबार्डच्या कर्जास हमी दिली असल्याने हमीपोटी दिलेली रक्कम शासनाने बँकेस अल्पमुदत कर्जरूपाने दिल्याचे संघटनेला मान्य नाही. कर्जाबाबत आवश्यक ती कागदपत्रे (दस्तऐवज) करून शासनाने दिलेली रक्कम कर्ज म्हणून मान्य नसल्याचे कर्मचारी प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे.कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीतशिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता विचारात घेता, यातून ७२२ कोटी सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास एकत्रितरित्या शासनाची देणे रक्कम ८२३ कोटी ४७ लाख इतकी होते. ती भागवून बँक २३० कोटी ११ लाखाने फायद्यात येऊ शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे समितीने सुचविलेल्या या शिफारशींबाबत शासनाकडून कर्मचाऱ्यांना आशा होती. शासनाने या शिफारशींबाबत विचार न केल्यामुळे कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.