शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सांगली भूविकास बँका ‘सलाईन’वर...

By admin | Updated: August 18, 2014 23:25 IST

कर्मचारी चिंतेत : शासनविरोधात आंदोलनाची तयारी

अविनाश कोळी - सांगली --राज्यातील भूविकास बॅँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्यातील सक्षम व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सर्वच बॅँका ‘सलाईन’वर आहेत. समितीच्या सकारात्मक शिफारसींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जागृत झालेली आशा आता निराशेत रूपांतरित झाली आहे. त्यामुळे शासनविरोधी आंदोलनाची तयारी कर्मचारी संघटनेने सुरू केली आहे. राज्यातील भूविकास बँकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्यातील या बँकांबाबत दोनवेळा अभ्यास समिती नियुक्त झाली. पहिल्या समितीने दिलेल्या शिफारसी या बँकांसाठी सकारात्मक नव्हत्या. त्यामुळे त्या अहवालाविरुद्ध कर्मचाऱ्यांची नाराजी होती. त्यामुळे दुसरी अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने सहकार विभाग व राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. सध्याच्या अहवालाबाबत संघटना सकारात्मक आहे. समितीतही संघटनेला स्थान देण्यात आले होते. त्यामुळे समितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.  यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत पुनरुज्जीवनाबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील भूविकास बॅँकांना पुन्हा ‘सलाईन’वर ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाने नाबार्डला शिखर बँकेच्यावतीने ७२७ कोटी ६३ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी हमी दिली होती. कर्ज, त्यावरील व्याज, जादा व्याज किंवा त्यावरील शुल्क याच्या परतफेडीसाठीची ही हमी होती. शासनास शिखर बँकेने देय असलेल्या रकमांची गोळाबेरीज १ हजार ७९७ इतकी नमूद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूस शिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता, जिंदगी, दायित्व अशा सर्व गोष्टींची गोळाबेरीज १२९९ रुपये इतकी होते. शासनकर्ज भागविण्यासाठी ४९१ कोटी रुपये कमी पडत आहेत. कर्मचारी संघटनेने एकरकमी परतफेड योजनेबद्दल एक मुद्दा मांडला आहे. राज्य शासनाने नाबार्डकडून एकरकमी परतफेड योजना घेताना बँकेस सहभागी करून घेतले नाही. शासनाने नाबार्डच्या कर्जास हमी दिली असल्याने हमीपोटी दिलेली रक्कम शासनाने बँकेस अल्पमुदत कर्जरूपाने दिल्याचे संघटनेला मान्य नाही. कर्जाबाबत आवश्यक ती कागदपत्रे (दस्तऐवज) करून शासनाने दिलेली रक्कम कर्ज म्हणून मान्य नसल्याचे कर्मचारी प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे.कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीतशिखर बँक व जिल्हा बँकांची मालमत्ता विचारात घेता, यातून ७२२ कोटी सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास एकत्रितरित्या शासनाची देणे रक्कम ८२३ कोटी ४७ लाख इतकी होते. ती भागवून बँक २३० कोटी ११ लाखाने फायद्यात येऊ शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे समितीने सुचविलेल्या या शिफारशींबाबत शासनाकडून कर्मचाऱ्यांना आशा होती. शासनाने या शिफारशींबाबत विचार न केल्यामुळे कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.