शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

सांगली-कुपवाडला दूषित पाणी

By admin | Updated: April 24, 2015 01:16 IST

महापौरांकडून खरडपट्टी : स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

सांगली : सांगली, कुपवाड शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित, हिरव्यागार पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल गुरुवारी महापौर विवेक कांबळे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. आठ दिवसांत पाण्यात सुधारणा न झाल्यास अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यात स्थायी समिती सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. कृष्णा नदीतील हिरव्यागार पाण्याला नदीकाठची गावे, शहरे व कारखानेच कारणीभूत असून, या गावांतून दूषित पाणी मिसळते का, याची प्रदूषण मंडळाने तपासणी करावी, असे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाचा तडाखा वाढला असतानाच नदीपात्रातील पाण्याचा रंगही बदलला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहराला हिरवट व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी दुपारी पाणीपुरवठा विभागाला भेट देऊन दूषित पाण्याबाबत तक्रार केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, केळकर यांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. सायंकाळी महापौर विवेक कांबळे यांनीही माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. कांबळे म्हणाले की, शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रातील एका प्लँटची वाळू बदलण्याचे काम झाले आहे. उर्वरित दोन प्लँटमध्ये हिरवट पाणी दिसत आहे. शेवाळही पसरले आहे. वाळू बदलण्याचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. उन्हाळा सुरू असून, शहरात रोगराई पसरू नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. रोगराई पसरल्यास अधिकारी, ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)