शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सांगली-कुपवाडला दूषित पाणी

By admin | Updated: April 24, 2015 01:16 IST

महापौरांकडून खरडपट्टी : स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

सांगली : सांगली, कुपवाड शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित, हिरव्यागार पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल गुरुवारी महापौर विवेक कांबळे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. आठ दिवसांत पाण्यात सुधारणा न झाल्यास अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यात स्थायी समिती सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. कृष्णा नदीतील हिरव्यागार पाण्याला नदीकाठची गावे, शहरे व कारखानेच कारणीभूत असून, या गावांतून दूषित पाणी मिसळते का, याची प्रदूषण मंडळाने तपासणी करावी, असे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाचा तडाखा वाढला असतानाच नदीपात्रातील पाण्याचा रंगही बदलला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहराला हिरवट व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी दुपारी पाणीपुरवठा विभागाला भेट देऊन दूषित पाण्याबाबत तक्रार केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, केळकर यांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. सायंकाळी महापौर विवेक कांबळे यांनीही माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. कांबळे म्हणाले की, शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रातील एका प्लँटची वाळू बदलण्याचे काम झाले आहे. उर्वरित दोन प्लँटमध्ये हिरवट पाणी दिसत आहे. शेवाळही पसरले आहे. वाळू बदलण्याचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. उन्हाळा सुरू असून, शहरात रोगराई पसरू नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. रोगराई पसरल्यास अधिकारी, ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)