शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सांगलीत कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

सांगली : सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी ४५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातील ...

सांगली : सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी ४५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातील अनेक उपनगरे पाण्याखाली गेली आहेत. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनीतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे, स्मशानभूमी पाण्याखाली आहेत.

शहराला पुन्हा महापुराची धास्ती लागली आहे. दिवसभरात पावसाचा जोरही कायम होता. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत फुटाफुटाने वाढ होत होती. सकाळी ४० फुटांपर्यंत असलेली पाणीपातळी सायंकाळपर्यंत ४४ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रीत सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, काका नगर, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरले होते.

सांगली- कर्नाळ रस्त्यावरील शेरीनाल्याचा पूल सकाळीच पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. टिळक चौकातील वैरण बाजारात पाणी शिरले होते. नदीकाठावरील स्वामी समर्थ मंदिरासह सर्वच मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरल्याने महापालिकेने अंत्यसंस्काराची सोय कुपवाड स्मशानभूमीत केली आहे. हरिपूर रस्त्यावरील नाल्यातही पाणी आले होते. जुना बुधगाव रस्ता, मल्टिपेक्स रस्ताही पाण्याखाली गेला आहे. वखारभागातील अनेक गॅरेजमध्ये पाणी आले होते. वखार भागातील वाहनतळही पाण्यात गेले होते. अनेक वाहने पुराच्या पाण्यात अडकली आहेत. सांगलीवाडीतील चिंचबागमध्ये पुराचे पाणी शिरले होते.

चौकट

हे रस्ते, वस्त्या पाण्याखाली

१. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर,मगरमच्छ काॅलनी, सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर, भारतनगर

२. सांगली -कर्नाळ रोड, जुना बुधगाव रोड, बायपास ते मल्टिपेक्स रोड पाण्याखाली

चौकट

शहरातील पाणीपुरवठा बंद

कृष्णा नदीपात्रातील महापालिकेच्या जॅकवेलला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुरामुळे पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

चौकट

२०० लोकांचे स्थलांतर

शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरल्याने २०० हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. महापालिकेसह विविध संघटनांनी स्थलांतरणासाठी नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी निवाऱ्यांची सोय करण्यात आली आहे.