शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगलीत कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

सांगली : सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी ४५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातील ...

सांगली : सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी ४५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे शहरातील अनेक उपनगरे पाण्याखाली गेली आहेत. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनीतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे, स्मशानभूमी पाण्याखाली आहेत.

शहराला पुन्हा महापुराची धास्ती लागली आहे. दिवसभरात पावसाचा जोरही कायम होता. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत फुटाफुटाने वाढ होत होती. सकाळी ४० फुटांपर्यंत असलेली पाणीपातळी सायंकाळपर्यंत ४४ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रीत सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, काका नगर, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरले होते.

सांगली- कर्नाळ रस्त्यावरील शेरीनाल्याचा पूल सकाळीच पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. टिळक चौकातील वैरण बाजारात पाणी शिरले होते. नदीकाठावरील स्वामी समर्थ मंदिरासह सर्वच मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरल्याने महापालिकेने अंत्यसंस्काराची सोय कुपवाड स्मशानभूमीत केली आहे. हरिपूर रस्त्यावरील नाल्यातही पाणी आले होते. जुना बुधगाव रस्ता, मल्टिपेक्स रस्ताही पाण्याखाली गेला आहे. वखारभागातील अनेक गॅरेजमध्ये पाणी आले होते. वखार भागातील वाहनतळही पाण्यात गेले होते. अनेक वाहने पुराच्या पाण्यात अडकली आहेत. सांगलीवाडीतील चिंचबागमध्ये पुराचे पाणी शिरले होते.

चौकट

हे रस्ते, वस्त्या पाण्याखाली

१. सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर,मगरमच्छ काॅलनी, सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर, भारतनगर

२. सांगली -कर्नाळ रोड, जुना बुधगाव रोड, बायपास ते मल्टिपेक्स रोड पाण्याखाली

चौकट

शहरातील पाणीपुरवठा बंद

कृष्णा नदीपात्रातील महापालिकेच्या जॅकवेलला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुरामुळे पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महापालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

चौकट

२०० लोकांचे स्थलांतर

शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, इनामदार प्लाॅट, कर्नाळ रोड, दत्तनगर, मगरमच्छ काॅलनीत पुराचे पाणी शिरल्याने २०० हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. महापालिकेसह विविध संघटनांनी स्थलांतरणासाठी नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी निवाऱ्यांची सोय करण्यात आली आहे.