शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

‘सांगली’ जयसिंगपूरला विना थांबा

By admin | Updated: April 18, 2016 00:22 IST

‘विना थांबा’ ठरतोय मारक : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावरील प्रवाशांची गैरसोय

संतोष बामणे -- जयसिंगपूर --कोल्हापूर-सांगली मार्गावर विना थांबा, विनावाहक एस़टी़ गेल्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे़ या एस़टी़मुळे सांगली व कोल्हापूरला थेट प्रवास करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे़ मात्र, जयसिंगपूर व अन्य ठिकाणी या मार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे ही सेवा शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना डोकेदुखी ठरली आहे़ धावत्या युगात कमी कालावधीत कामगारांना व प्रवाशांना थेट त्या-त्या गावाला जाण्यासाठी सोय व्हावी, या हेतूने सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार आगारांकडून सांगली-कोल्हापूर, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी अशा विना थांबा, विनावाहक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळेच सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार शहरांतील प्रवाशांच्या वेळेची बचत झाली असली तरी या मार्गावर मुख्य जयसिंगपूर बसस्थानक असून, येथून हजारो प्रवासी दैनंदिन प्रवास करीत असतात़ याबरोबर सांगली-कोल्हापूर, इचलकरंजी या मार्गावर मोठमोठी गावे असल्यामुळे प्रवासी वर्ग अधिक आहे़ मात्र, या सेवेमुळे जयसिंगपूरच्या प्रवाशांना विना थांब्याचा त्रास होत असून, ताटकळत थांबून साधी गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे़ कोल्हापूर-सांगली विना थांबा बस सुरू असल्याने जयसिंगपूर बसस्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या घटली असून, लांब पल्ल्याच्या सोलापूर, पंढरपूर, आदी मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांवर जयसिंगपूरच्या प्रवाशांना विसंबून राहावे लागत आहे़ दरम्यान, सांगली-कोल्हापूर मार्गावर विनावाहक वगळता एशियाड बसेसची संख्या वाढली आहे़ त्यामुळे प्रवाशांना या गाडीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ दरम्यान, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी या मार्गावर धामणी, अंकली, उदगाव, जयसिंगपूर, खोतवाडी, यड्राव, चिपरी, तारदाळ, आदी गावांतील प्रवासी मोठ्या संख्येने असल्यामुळे विना थांबा सेवेचा त्रास या गावांनाही सहन करावा लागत आहे़ प्रवासी बसथांब्यावर थांबले असता विना थांबा बस निम्मी रिकामी समोरून जाते. मात्र, तिला थांबा नसल्यामुळे ती थांबत नाही. तसेच त्यामागून येणारी बस ही साधी असल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्थानिर्माण झाली आहे़ प्रवाशांतून तीव्र नाराजीसांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़ प्रवाशांतून तीव्र नाराजीसांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़ सांगली-कोल्हापूर मार्गावर विना थांबा बससेवा सुरू झाल्यामुळे जयसिंगपूरसह अन्य ठिकाणच्या प्रवाशांना ताटकळत थांबल्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही़ तर साधी बस आल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येते़ त्यामुळे कोल्हापूरला कसे जायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ सांगली-कोल्हापूर मार्गावर साध्या गाड्यांची सोय करून सर्व ठिकाणी थांबतील व ग्रामीण भागातील लोकांनाही या एस़टी़चा लाभ होईल, असा विचार महामंडळाने करून साध्या गाड्याही प्रत्येक अर्ध्या तासाला सोडणे गरजेचे आहे़