शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वेश्या व्यवसायाचे सांगली-इचलकरंजी कनेक्शन

By admin | Updated: May 6, 2016 01:10 IST

एजंटांवरील कारवाईकडे लक्ष : जयसिंगपूर शहरातील ‘ते’ लॉज आता पोलिसांच्या हिटलिस्टवर

जयसिंगपूर : अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जयसिंगपूर येथे छापा टाकून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलचा पर्दाफाश केल्यानंतर शहरात असा व्यवसाय चालविणारे लॉज आता हिटलिस्टवर आले आहेत़ उशिरा का होईना पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शहरवासीयांतून स्वागत होत असले, तरी सांगली आणि इचलकरंजीचे कनेक्शन शहरातील काही लॉजचालक व महिला पुरविणारे एजंट यांच्याशी असल्यामुळे यावर किती ठोसपणे कारवाई होते याकडे आता लक्ष लागून राहिले आहे़तमदलगेपासून उदगावपर्यंत तसेच शिरोळ बायपास रोडवर लॉजची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे़ कमी वेळेत जादा फायदा मिळविण्याच्या हेतूने काही लॉजचालकांनी वेश्या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या महिला व एजंटांशी संपर्क साधून हा छुपा व्यवसाय सुरू ठेवला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून याची व्याप्ती वाढली आहे़स्थानिक पोलिसांकडून जुजबी कारवाईचा प्रकार अनेकदा घडला आहे़ मात्र, पोलिसांनी या व्यवसायाकडे गांधारीची भूमिका घेतल्यामुळे आणि ‘लक्ष्मी’चे दर्शन होत असल्यामुळे या व्यवसायाला अभय मिळत असल्याची चर्चा आहे़ चौंडेश्वरी सूतगिरणीजवळ असलेल्या एका लॉजवर कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकला होता़ राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकार रात्रीत मिटविण्यात आला होता़ याची शहरात मोठी चर्चाही झाली होती़काही लॉजवर एजंटांच्या माध्यमातून वेश्या व्यवसायाने जाळे निर्माण केले आहे़ इचलकरंजीतील रिक्षाचालक एजंटांच्या माध्यमातून हा व्यवसाय फोफावला आहे़ सांगलीतील मॅडम नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलेशी सलगी करून काही व्यापाऱ्यांनी वेश्या व्यवसायाला चालना दिलीे़ जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील हॉटेल सप्तगिरी लॉजवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींसह एजंट व हॉटेल व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आल्यानंतर वेश्या व्यवसायाचे पितळ उघडे पडले आहे़ सप्तगिरी लॉजवरील कारवाई स्वागतार्ह असली, तरी पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे वेश्या व्यवसायाला कसा पायबंद घालतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे़ (प्रतिनिधी)स्पेशल ब्रँचचे पथककोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या वेश्या व्यवसायावर विशेष कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे़ जयसिंगपूर शहरात काही लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत यापूर्वी नागरिकांनी तक्रारी दिल्याचे समजते़ यामुळे स्थानिक पोलिस व विशेष पथक कशा पद्धतीने कारवाई करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे़विशेष पथकाच्या कारवाईची वाट न पाहता स्थानिक पोलिसांनी शहरातील वेश्या व्यवसायासह अवैध धंद्याविरोधात कारवाईची धडक मोहीम राबवून अशा व्यवसायाला हद्दपार करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ ही जबाबदारी आता जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयासह स्थानिक पोलिसांची बनली आहे़ ‘ये रे माझ्या मागल्या..’प्रमाणे कारवाई होणार की या व्यवसायाचा बिमोड होणार, याचे उत्तर आता काळच देईल़