शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

चार पुलांमुळे सांगली सापडतेय महापुराच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही बाजूंनी महापुराच्या जबड्यात ढकलले जात आहे. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात असल्याची तज्ज्ञांची भूमिका आहे.

कृष्णेवर सध्या आयर्विन, बायपास हे दोन पूल अस्तित्वात आहेत. हरिपूर - कोथळी पूल पूर्णत्वाकडे आहे, तर सांगलीवाडी ते पांजरपोळ पुलाची चर्चा सुरु आहे. या पुलांच्या नियोजनात जलशास्त्रीय विचार केला जात नसल्याने सांगली महापुरात ढकलली जात आहे. हरिपूर - कोथळी पुलाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा प्रकर्षाने पटलावर आली आहे. यंदा ४५ फुटांच्या इशारा पातळीलाच पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे पावसाळ्यात उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे. दोन्ही बाजूच्या भरावामुळेही पाणी अडून राहणार आहे. भरावाऐवजी पिलर टाकून बॉक्स तयार करता येईल, त्यावरुन जोडरस्ते तयार करता येतील असाही प्रस्ताव आहे. हरिपूर ग्रामस्थांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता, पण दोन ते तीन कोटींचा खर्च वाढण्याने प्रस्ताव मागे पडला.

रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव देखील महापुराची तीव्रता वाढविणारा आहे. महामार्गासाठी सुमारे १५ फूट उंच भराव टाकला आहे. कोल्हापूर रस्त्यावर पसरणारे कृष्णेचे पाणी अंकलीकडून नदीत परतण्याचा मार्ग भरावामुळे अडवला गेला आहे. भरावाऐवजी अंकली फाट्यापासून मिरजेकडे सुमारे १० किलोमीटरपर्यंत उड्डाणपुलाची मागणी इनाम धामणी ग्रामस्थांनी केली आहे, पण रस्त्याचे काम पुढे गेले असल्याने हा पर्याय मागे पडला आहे.

या स्थितीत आता सांगलीवाडीतून शहराला जोडणाऱ्या पुलाची चर्चा सुरू आहे. तो प्रत्यक्षात आल्यास महापुराचे पाणी पुढे न जाता थेट सांगलीतच घुसण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भरावाऐवजी बॉक्सचा पर्याय

पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांवर भराव टाकण्याऐवजी बॉक्सचा पर्याय तज्ज्ञांनी सुचविला आहे. सिमेंटच्या पिलरवर स्लॅब टाकून जोडरस्ते तयार करता येतील, जेणेकरुन त्याखालून पुराचे पाणी वाहून जाईल.

कोट

हरिपूर - कोथळी पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव न टाकता बॉक्स बनविल्यास महापुराचे पाणी अडून राहणार नाही. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात आहे.

- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

- पुलामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात, फुगवटा तयार होतो हे नाकारुन चालणार नाही. जोड रस्त्यांची उंची कमी ठेवल्याने महापुरात पूल निरुपयोगी ठरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल उभारताना पाटबंधारेशी समन्वय राखला पाहिजे.

- विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता.