शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

चार पुलांमुळे सांगली सापडतेय महापुराच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही बाजूंनी महापुराच्या जबड्यात ढकलले जात आहे. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात असल्याची तज्ज्ञांची भूमिका आहे.

कृष्णेवर सध्या आयर्विन, बायपास हे दोन पूल अस्तित्वात आहेत. हरिपूर - कोथळी पूल पूर्णत्वाकडे आहे, तर सांगलीवाडी ते पांजरपोळ पुलाची चर्चा सुरु आहे. या पुलांच्या नियोजनात जलशास्त्रीय विचार केला जात नसल्याने सांगली महापुरात ढकलली जात आहे. हरिपूर - कोथळी पुलाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा प्रकर्षाने पटलावर आली आहे. यंदा ४५ फुटांच्या इशारा पातळीलाच पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे पावसाळ्यात उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे. दोन्ही बाजूच्या भरावामुळेही पाणी अडून राहणार आहे. भरावाऐवजी पिलर टाकून बॉक्स तयार करता येईल, त्यावरुन जोडरस्ते तयार करता येतील असाही प्रस्ताव आहे. हरिपूर ग्रामस्थांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता, पण दोन ते तीन कोटींचा खर्च वाढण्याने प्रस्ताव मागे पडला.

रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव देखील महापुराची तीव्रता वाढविणारा आहे. महामार्गासाठी सुमारे १५ फूट उंच भराव टाकला आहे. कोल्हापूर रस्त्यावर पसरणारे कृष्णेचे पाणी अंकलीकडून नदीत परतण्याचा मार्ग भरावामुळे अडवला गेला आहे. भरावाऐवजी अंकली फाट्यापासून मिरजेकडे सुमारे १० किलोमीटरपर्यंत उड्डाणपुलाची मागणी इनाम धामणी ग्रामस्थांनी केली आहे, पण रस्त्याचे काम पुढे गेले असल्याने हा पर्याय मागे पडला आहे.

या स्थितीत आता सांगलीवाडीतून शहराला जोडणाऱ्या पुलाची चर्चा सुरू आहे. तो प्रत्यक्षात आल्यास महापुराचे पाणी पुढे न जाता थेट सांगलीतच घुसण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चौकट

भरावाऐवजी बॉक्सचा पर्याय

पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांवर भराव टाकण्याऐवजी बॉक्सचा पर्याय तज्ज्ञांनी सुचविला आहे. सिमेंटच्या पिलरवर स्लॅब टाकून जोडरस्ते तयार करता येतील, जेणेकरुन त्याखालून पुराचे पाणी वाहून जाईल.

कोट

हरिपूर - कोथळी पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव न टाकता बॉक्स बनविल्यास महापुराचे पाणी अडून राहणार नाही. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात आहे.

- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

- पुलामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात, फुगवटा तयार होतो हे नाकारुन चालणार नाही. जोड रस्त्यांची उंची कमी ठेवल्याने महापुरात पूल निरुपयोगी ठरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल उभारताना पाटबंधारेशी समन्वय राखला पाहिजे.

- विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता.