शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्केच पशुगणना पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:11 IST

सांगली : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना सुरू असली तरी, तिला म्हणावा तितका प्रतिसाद यंत्रणेकडून मिळालेला नाही. ३० एप्रिलअखेर जिल्ह्याची ...

सांगली : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना सुरू असली तरी, तिला म्हणावा तितका प्रतिसाद यंत्रणेकडून मिळालेला नाही. ३० एप्रिलअखेर जिल्ह्याची पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश असून, सध्या जिल्ह्याची पशुगणना केवळ ६७ टक्के पूर्ण झाली आहे.तांत्रिक अडचणीमुळे मागील काही वर्षांपासून पशुगणना झालेली नाही. पशुसंवर्धन विभागाला केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी पशुगणनेवरच अवलंबून राहावे लागते. लसीकरण, दुष्काळी उपाययोजनांसाठी पशुगणना गरजेची असते. यापूर्वी २०१३ मध्ये पशुगणना झालेली होती. त्यामध्ये गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांची संख्या सहा लाख ६७ हजार ६३५ होती. मोठी जनावरे एक लाख ६६ हजार ५४५, लहान जनावरे चार लाख ८२ हजार बावीस होती. याशिवाय तेरा लाख १६ हजार २०२ शेळ्या-मेंढ्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये पशुगणना करण्यात येणार होती, मात्र त्यावेळी टॅब उपलब्ध नसल्यामुळे ती प्रलंबित राहिली होती. त्यानंतर टॅब उपलब्ध होऊनदेखील पशुगणना झाली नव्हती. उशिरा टॅब मिळाल्याने गणनेचे काम करता आले नाही. टॅब कमी पडल्याने तसेच दुर्लक्ष झाल्याने पशुसंवर्धन आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात १५५ प्रगणक असून, त्यासाठी खासगी मनुष्यबळ आणि पशुपर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्याची ६७ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातील ७२ टक्के, तर महापालिका क्षेत्रात केवळ ४४ टक्केच पशुगणना झाली आहे. ग्रामीण भागातील काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील पशुगणना करण्यासाठी प्रगणकांची संख्या कमी असल्यामुळे वेळेत काम संपवण्याचे आव्हान आहे. महापालिका क्षेत्रातील अधिकाºयांनी काही प्रगणकांची नियुक्ती केली आहे; पण त्यातील काहीजण नागरिकांकडून माहिती व्यवस्थित भरुन घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी तर लहान मुलांकडूनच पशुगणना केली जात असल्याचा प्रकार पुढे आला होता. तक्रार करणाºया नागरिकांनाच अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.तांत्रिक अडचणीमुळे पशुगणनेला उशीर : संजय धाकटेजिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७२ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रातील पशुगणना ४४ टक्के झाली आहे. या पशुगणनेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या कामासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची नियुक्ती केल्याचे सांगितले आहे. येत्या दि. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्याची पशुगणना शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय धाकटे यांनी दिली.