शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्केच पशुगणना पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:11 IST

सांगली : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना सुरू असली तरी, तिला म्हणावा तितका प्रतिसाद यंत्रणेकडून मिळालेला नाही. ३० एप्रिलअखेर जिल्ह्याची ...

सांगली : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना सुरू असली तरी, तिला म्हणावा तितका प्रतिसाद यंत्रणेकडून मिळालेला नाही. ३० एप्रिलअखेर जिल्ह्याची पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश असून, सध्या जिल्ह्याची पशुगणना केवळ ६७ टक्के पूर्ण झाली आहे.तांत्रिक अडचणीमुळे मागील काही वर्षांपासून पशुगणना झालेली नाही. पशुसंवर्धन विभागाला केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी पशुगणनेवरच अवलंबून राहावे लागते. लसीकरण, दुष्काळी उपाययोजनांसाठी पशुगणना गरजेची असते. यापूर्वी २०१३ मध्ये पशुगणना झालेली होती. त्यामध्ये गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांची संख्या सहा लाख ६७ हजार ६३५ होती. मोठी जनावरे एक लाख ६६ हजार ५४५, लहान जनावरे चार लाख ८२ हजार बावीस होती. याशिवाय तेरा लाख १६ हजार २०२ शेळ्या-मेंढ्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये पशुगणना करण्यात येणार होती, मात्र त्यावेळी टॅब उपलब्ध नसल्यामुळे ती प्रलंबित राहिली होती. त्यानंतर टॅब उपलब्ध होऊनदेखील पशुगणना झाली नव्हती. उशिरा टॅब मिळाल्याने गणनेचे काम करता आले नाही. टॅब कमी पडल्याने तसेच दुर्लक्ष झाल्याने पशुसंवर्धन आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात १५५ प्रगणक असून, त्यासाठी खासगी मनुष्यबळ आणि पशुपर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्याची ६७ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातील ७२ टक्के, तर महापालिका क्षेत्रात केवळ ४४ टक्केच पशुगणना झाली आहे. ग्रामीण भागातील काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील पशुगणना करण्यासाठी प्रगणकांची संख्या कमी असल्यामुळे वेळेत काम संपवण्याचे आव्हान आहे. महापालिका क्षेत्रातील अधिकाºयांनी काही प्रगणकांची नियुक्ती केली आहे; पण त्यातील काहीजण नागरिकांकडून माहिती व्यवस्थित भरुन घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी तर लहान मुलांकडूनच पशुगणना केली जात असल्याचा प्रकार पुढे आला होता. तक्रार करणाºया नागरिकांनाच अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.तांत्रिक अडचणीमुळे पशुगणनेला उशीर : संजय धाकटेजिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७२ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रातील पशुगणना ४४ टक्के झाली आहे. या पशुगणनेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या कामासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची नियुक्ती केल्याचे सांगितले आहे. येत्या दि. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्याची पशुगणना शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय धाकटे यांनी दिली.