शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह लावण्यात सांगली जिल्हा राज्यापेक्षा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST

सांगली : बालविवाह लावून देण्यात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची बाब शासनाच्याच कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली ...

सांगली : बालविवाह लावून देण्यात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची बाब शासनाच्याच कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली आहे. शासनाचा कायदा धुडकावून लावत मुलींच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कुटुंबांची संख्या जिल्ह्यात अद्यापही मोठी आहे. मुलीला डोईवरचा भार समजून वयात येण्यापूर्वीच तिच्या मानसिक व शारीरिक विकासाला खीळ घालण्याचा प्रकार या माध्यमातून सुरू आहे.

कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये राज्यात १८ व र्षापूर्वी विवाह होणाऱ्या मुलींची संख्या २१.९ टक्के आहे. सांगली जिल्ह्यात हाच आकडा २७ टक्के इतके आहे. म्हणजे राज्यापेक्षा ५ टक्के अधिक प्रमाण आहे. बालविवाहाच्या बाबतीत रेड झोनमध्ये असलेल्या देशातील १७ जिल्ह्यांमध्येही सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हे प्रकार रोखण्यासाठी माेठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. कारवाईच्या स्तरावर प्रतिबंध बसविण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

चौकट

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात १२ विवाह राेखले

जिल्ह्यात कोरोनाच्या आठ महिन्यातही बालविवाह लावून देण्याचे प्रमाण अधिक होते. यातील १२ विवाह महिला व बाल कल्याण विभागाने ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडीसेविका यांच्या माध्यमातून राेखले. बऱ्याचठिकाणी बालविवाह लावणाऱ्या कुटुंबांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याचेही प्रकार घडले.

चौकट

जिल्ह्यात ६६९ बालसंरक्षक समित्या पाहतात काम

जिल्ह्यातील एकूण ७२९ गावांपैकी ६६१ गावांमध्ये ग्रामीण बालसंरक्षण समित्या (व्हीसीपीसी) स्थापन करण्यात आल्या आहेत. दहा गटांपैकी (ब्लॉक) आठठिकाणी ब्लॉक चाईल्ड प्रोटेक्शन कमिट्या स्थापन केल्या आहेत. उर्वरीत ६० गावात व २ ब्लॉकमध्ये संरक्षण समित्या स्थापन करण्याचे काम सुरू आहे.

चौकट

बालविवाह कायदा काय आहे?

बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्यास २ वर्षापर्यंत सक्तमजुरी आणि रु.एक लाखपर्यंत दंडाची शिक्षा आहे.

कोट

गावपातळीवरच असे बालविवाह रोखण्यासाठी आम्ही समित्या स्थापन केल्या आहेत. सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांना जबाबदारी दिली आहे. आता हे प्रकार रोखण्यासाठी आणखी जास्त उपाययोजना करण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. तक्रारीनंतर तातडीने असे विवाह रोखले जात आहेत.

- सुवर्णा पवार, महिला व बालक कल्याण अधिकारी