शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

बालविवाह लावण्यात सांगली जिल्हा राज्यापेक्षा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST

सांगली : बालविवाह लावून देण्यात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची बाब शासनाच्याच कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली ...

सांगली : बालविवाह लावून देण्यात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची बाब शासनाच्याच कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली आहे. शासनाचा कायदा धुडकावून लावत मुलींच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कुटुंबांची संख्या जिल्ह्यात अद्यापही मोठी आहे. मुलीला डोईवरचा भार समजून वयात येण्यापूर्वीच तिच्या मानसिक व शारीरिक विकासाला खीळ घालण्याचा प्रकार या माध्यमातून सुरू आहे.

कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये राज्यात १८ व र्षापूर्वी विवाह होणाऱ्या मुलींची संख्या २१.९ टक्के आहे. सांगली जिल्ह्यात हाच आकडा २७ टक्के इतके आहे. म्हणजे राज्यापेक्षा ५ टक्के अधिक प्रमाण आहे. बालविवाहाच्या बाबतीत रेड झोनमध्ये असलेल्या देशातील १७ जिल्ह्यांमध्येही सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हे प्रकार रोखण्यासाठी माेठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. कारवाईच्या स्तरावर प्रतिबंध बसविण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

चौकट

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात १२ विवाह राेखले

जिल्ह्यात कोरोनाच्या आठ महिन्यातही बालविवाह लावून देण्याचे प्रमाण अधिक होते. यातील १२ विवाह महिला व बाल कल्याण विभागाने ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडीसेविका यांच्या माध्यमातून राेखले. बऱ्याचठिकाणी बालविवाह लावणाऱ्या कुटुंबांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याचेही प्रकार घडले.

चौकट

जिल्ह्यात ६६९ बालसंरक्षक समित्या पाहतात काम

जिल्ह्यातील एकूण ७२९ गावांपैकी ६६१ गावांमध्ये ग्रामीण बालसंरक्षण समित्या (व्हीसीपीसी) स्थापन करण्यात आल्या आहेत. दहा गटांपैकी (ब्लॉक) आठठिकाणी ब्लॉक चाईल्ड प्रोटेक्शन कमिट्या स्थापन केल्या आहेत. उर्वरीत ६० गावात व २ ब्लॉकमध्ये संरक्षण समित्या स्थापन करण्याचे काम सुरू आहे.

चौकट

बालविवाह कायदा काय आहे?

बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्यास २ वर्षापर्यंत सक्तमजुरी आणि रु.एक लाखपर्यंत दंडाची शिक्षा आहे.

कोट

गावपातळीवरच असे बालविवाह रोखण्यासाठी आम्ही समित्या स्थापन केल्या आहेत. सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांना जबाबदारी दिली आहे. आता हे प्रकार रोखण्यासाठी आणखी जास्त उपाययोजना करण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. तक्रारीनंतर तातडीने असे विवाह रोखले जात आहेत.

- सुवर्णा पवार, महिला व बालक कल्याण अधिकारी