शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:03 IST

सांगली : वसंतदादा साखर कारखाना सुरू केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या सभासदास दुसºया सभासदाने विरोध दर्शविल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ झाला. बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण सुरु असतानाच हा ठराव मांडण्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र सभासद संतप्तच असल्याने अखेर खा. ...

सांगली : वसंतदादा साखर कारखाना सुरू केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या सभासदास दुसºया सभासदाने विरोध दर्शविल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गदारोळ झाला. बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण सुरु असतानाच हा ठराव मांडण्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र सभासद संतप्तच असल्याने अखेर खा. संजयकाका पाटील यांनी सभासदांना, कुणी दमबाजीची भाषा वापरून शहाणपणा करू नये, असा इशारा देताच तणाव निवळला.दरम्यान, बॅँकेला अडचणीतून बाहेर आणण्यात यशस्वी झालो असून वसंतदादा कारखान्याच्या करारामध्ये काहीही आक्षेपार्ह झाले नसून काहीजण विनाकारण हा विषय लावून धरत असल्याचे सांगत बँकेच्या ‘व्हिजन २०१९’मध्ये ६ हजार कोटींचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी वसंतदादा सभागृहात अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक करून सभेच्या कामकाजास सुरूवात केली. यावेळी, वसंतदादा कारखाना भाडेत्त्वावर देऊन त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. करारात कोणताही गोेंधळ नसल्याबाबतचे स्पष्टीकरण ते देत होते. यावेळी अचानकच धनगाव (ता. पलूस) येथील सभासद नंदकुमार साळुंखे यांनी, शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करुन कारखाना सुरु केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर अध्यक्षांचे भाषण सुरु असताना अभिनंदनाचा ठराव मांडता येणार नसल्याचे सांगून, बोरगाव (ता. वाळवा) च्या तानाजी पाटील यांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी पाटील हे आपले म्हणणे मांडत असल्याने उपस्थित काही सभासदांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गोेंधळातही पाटील यांनी ठरावाला माझा विरोध कायम राहणार असल्याचे सांगितल्याने काही सभासद त्यांच्या अंगावर धावून गेले. यात अध्यक्षांनी हस्तक्षेप करून, गोंधळ करू नका प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर दिले जाईल असे सांगितले. तरीही गोंधळ सुरूच राहिला. अखेर खा. संजयकाका पाटील यांनी उभे राहत, सभा शांततेत सुरू असून कोणीही दमबाजीची भाषा करून शहाणपणा करू नये असे म्हणताच, सर्वजण शांत झाले व त्यानंतर सभा पुन्हा सुरळीत सुरू झाली.प्रभारी कार्यकारी संचालक एम. बी. रामदुर्ग बॅँकेचा आढावा मांडत असताना पुन्हा एकदा तानाजी पाटील यांनी हस्तक्षेप करत आपले म्हणणे मांडले. यावर काही सभासद पुन्हा एकदा आक्रमक झाल्यानंतर खा. पाटील यांचा पारा पुन्हा चढला. ही बॅँकेची सभा आहे. इतरांनी शहाणपणा करू नये. सभासदांना प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. इतरांनी काय बांगड्या भरल्या आहेत काय? असा सवाल करत, गंमत करायला पाच मिनिटे लागणार नाहीत, असे सुनावताच पुन्हा सभा सुरळीत सुरू झाली.अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की, वसंतदादा कारखाना करारातून बँकेचे चारशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबाबतचा आरोप चुकीचा आहे. बँकेची कारखान्याकडे ६३.६८ कोटी रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीपोटी कारखाना ताब्यात घेऊन त्याची मालमत्ता न विकता तो भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या लेखापरीक्षणात काही त्रुटी लक्षात आणून देण्यात आल्या असून त्या दुरुस्त करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच करारात दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे विनाकारण कोणीही बॅँकेची बदनामी करू नये.यावेळी संग्रामसिंह देशमुख, आ. मोहनराव कदम, विशाल पाटील, सी. बी. पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत, प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, कमल पाटील, डी. के. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक एम. बी. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील, उपव्यवस्थापक जे. जे. पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी उपस्थित होते.