शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

सांगली - काँग्रेस आघाडीत रंगली साठमारी

By admin | Updated: August 27, 2014 23:18 IST

विधानसभा निवडणूक : स्थानिक संघर्षाला धार

अविनाश कोळी --सांगली  विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून सुरू झालेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा मुलाखतीतही घुमला. आघाडी झाली तर बंडखोरी अटळ असल्याचा इशाराच यानिमित्ताने देण्यात आला आहे. काँग्रेसने एकीकडे स्वबळाचा ठरावच केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आठपैकी सात मतदारसंघांसाठीच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील आघाडीत राजकीय साठमारीचा हा खेळ रंगला असून, दोन्ही पक्षांकडे आठ मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या संख्येचे अर्धशतक झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी काँग्रेसची बैठक घेऊन, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात म्हणून ठराव केला. प्रदेश कार्यकारिणीकडे तो पाठविण्यात आला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बैठका व मेळाव्यांमधूनही बहुतांश नेत्यांनी स्वबळाची मागणी केली. आघाडीबाबतचे निर्णय पक्षश्रेष्ठींमार्फत घेतले जाणार असले तरी, स्वबळाच्या मागणीमागे बंडखोरीचा इशारा लपला आहे. आघाडी झालीच तर प्रत्येक मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला डिवचण्याचे प्रकार केले जाणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते व इच्छुकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांकडे आठ विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल ५३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे ३४ आणि राष्ट्रवादीचे १९ इच्छुक आहेत. काँग्रेसने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी आणि जत अशा पाच मतदारसंघांसाठी, तर राष्ट्रवादीने पलूस-कडेगाव वगळता अन्य सातही मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना दिले जाणारे इशारे आता पडद्याआड असले तरी, प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडी धर्माच्या नावाखाली बंडाचे झेंडे फडकविले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचा गाजावाजा करण्यात आला. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी धर्म पाळला, तर काहींनी नुसतेच मौन बाळगले होते. मात्र विधानसभेच्या रणांगणात आघाडीतील नेतेच एकमेकांच्या विरोधात असल्याने आघाडी धर्माची गोची झाली आहे. आघाडी धर्मामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातूनच साठमारीचा खेळ रंगला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, दिनकर पाटील यांनी, तर काँग्रेसवर नाराज असलेले शिवाजीराव नाईक अशा नेत्यांनी आघाडीला उघडपणे विरोध केला होता. अन्य नेत्यांकडून आघाडी धर्माच्या पालनाचा भास निर्माण करण्यात आला. बहुतांश ठिकाणी छुपी बंडखोरी होती. दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील तीव्र विरोध आता विधानसभेच्या निमित्ताने उफाळला आहे. गळती आणि राष्ट्रवादीची खेळीआघाडी धर्माच्या नावाखाली होत असलेली घुसमट असह्य झाल्याने राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. काही नेते आघाडी झाली तर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. या सर्व गोष्टींवर तात्पुरता उपाय म्हणून राष्ट्रवादीने सात मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज दाखल करून घेतले. स्वबळाची मागणी जोर धरत असल्याने, किमान मुलाखतीतून तशी तयारी केली जात असल्याचा भास निर्माण केला जात आहे.