शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीला सांगलीतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

संग्रहित फोटो वापरणे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू झालेल्या २१ दिवसांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनला आज, मंगळवारी ...

संग्रहित फोटो वापरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू झालेल्या २१ दिवसांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनला आज, मंगळवारी (दि. २३) एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सांगलीकरांनी प्रचंड त्रास आणि नुकसान सोसले, तरीही त्यातून शहाणपणा मिळविल्याचे दिसून येत नाही. बेजबाबदार नागरिकांमुळे गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढली असून जिल्ह्यात कोरोना धोक्याच्या उंबरठ्यावर आहे.

सांगलीकरांना आयुष्यभर विसरता येणार नाही, असा धडा देणाऱ्या कोरोनाला लोकांनी अजूनही अगदीच हलक्यात घेतल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येते. गेल्या आठवडाभरात दररोजची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात पोहोचली आहे. वर्षभरात १७७३ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. हजारोंना रोजगारावर नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले. बाजारपेठांचे कंबरडे मोडले, तर औद्योगिक वसाहतीची चक्रे अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. कृषिक्षेत्राची हानीही भरून निघालेली नाही. जत्रा-यात्रा रद्द झाल्याने लोककला, यात्रेतील व्यावसायिकांचा सुपडासाफ झाला. हॉटेल्सना सूर सापडलेला नाही. चित्रपटगृहांतील संख्येवर मर्यादा आल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्याची महसुली यंत्रणा पूर्णत: ठप्प झाली. विकासकामांचा ६७ टक्के निधी आरोग्य क्षेत्राकडे वळता झाला. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांची सारी यंत्रणा कोरोनाच्या बंदोबस्तात गुंतली, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला. साखर कारखाने, कृषी व अैाद्योगिक निर्यात, पर्यटन या साऱ्याला खो बसला.

चौकट

काय गमावले?

गेल्या वर्षभरात एकही सण मुक्तपणे साजरा करता आला नाही. बाजारपेठांत सुतकी वातावरणच राहिले. जिल्ह्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी अनेक कर्तृत्ववान माणसे कोरोनाने आपल्यातून नेली, त्याचे मोल करताच येणार नाही.

चौकट

काय मिळविले?

आरोग्यासंदर्भातील जागरूकता ही एकमेव कमाई वर्षभरात झाली. कोरोनामुळे अन्य आजार झपाट्याने कमी झाले. आरोग्यावरील खर्च व सजगता वाढली. सरकारी रुग्णालये अपडेट झाली. खासगी रुग्णालयांनीदेखील साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली.

चौकट

वर्षभरात १७७३ जणांनी जग सोडले

वर्षभरात ४९ हजार ६२६ जण कोरोनाबाधित झाले. १७७३ जण प्राणास मुकले, ४७ हजार ५९ रुग्ण बरे झाले. महापालिका क्षेत्रात १७ हजार ११३, तर ग्रामीण भागात २५ हजार ११९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. वर्ष पूर्ण झाल्यानंतरही कोरोना जिल्ह्यातून हद्दपार झालेला नाही, उलट ७९४ जण अजूनही उपचार घेत आहेत.

पॉइंटर्स

- उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्राचे नुकसान : सुमारे दहा हजार कोटी

- एसटी, रेल्वे व खासगी वाहतूक क्षेत्राला फटका : एक हजार कोटी

- कृषिक्षेत्राची हानी : सुमारे २० हजार कोटी