शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

सांगलीत १९ दुचाकी जप्त; तिघांना अटक

By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST

एलसीबीची कारवाई : सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, मुंबईतून चोरी; कोठडीत रवानगी

सांगली : सांगली, कोल्हापूर व मुंबई येथून दुचाकी चोरुन त्याची अवघ्या पाच हजारापासून ते दहा हजारात विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. टोळीकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ७ लाख दहा हजार रुपये आहे.अटक केलेल्यांमध्ये विनायक ऊर्फ छोट्या ऊर्फ पप्या सुभाष पाटोळे (वय २३, रा. आंबेडकरनगर, साखराळे, ता. वाळवा), गुरुप्रसाद सुरेश खांडके (२३, दुर्गा अपार्टमेंट, मंत्री कॉलनी, सरकारी दवाखान्यामागे, वाळवा) व शशिकांत ऊर्फ बाळू दिनकर देसाई (२३, हनुमाननगर, इस्लामपूर) यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात पुण्यात बॉम्बस्फोट करण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात आला होता. स्फोटात वापरण्यात आलेली ही दुचाकी कऱ्हाड येथील एका पोलिसाची चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.या विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार दीपक पाटील, अशोक डगळे, शंकर पाटील, कुलदीप कांबळे, उदय माळी, अझर पिरजादे, चेतन महाजन, चालक सचिन सूर्यवंशी व काबुगडे यांचे पथक सांगलीवाडीत गस्त घालत होते. तेथील जकात नाक्याजवळ संशयित तिघेही एकाच दुचाकीवरुन भरधाव वेगाने जाताना आढळून आले. त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली, त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरीसाठी फिरत असल्याची कबुली दिली.गेल्या वर्षभरापासून ते दुचाकी चोरी करीत आहेत. विनायक पाटोळे हा त्यांचा म्होरक्या आहे. सांगली शहर, सांगली ग्रामीण, इस्लामपूर या तीन पोलीस ठाण्यासह त्यांनी इचलकरंजी व मुंबईतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुचाकींची त्यांनी पाच हजारापासून ते दहा हजारात विक्री केली होती. दुचाकी खरेदी करणाऱ्या १९ जणांची नावे निष्पन्न झाली. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकी खरेदी केल्याचे सांगितले. या सर्वांना साक्षीदार करण्यात येणार आहे. केवळ चैनीसाठी त्यांनी चोरीचा हा मार्ग अवलंबला आहे. ते प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. संशयितांचा जामीन फेटाळलाअटकेत असलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शनिवार) संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर संशयितांनी न्यायाधीश श्रीमती एम. आर. यादव यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तिघांचेही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. यावेळी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर तीनही संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांनी अणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)