शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:31 IST

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.

ठळक मुद्देअखेर सांगलीच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देऊन मुंबई महापालिकेचे पथक परतले.

सांगली : महापूर ओसरल्यानंतर सांगलीच्या स्वच्छतेत मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. तब्बल आठवडाभर ४५० कर्मचाऱ्यांचे पथक अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले होते. मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले.

महापुरानंतर खºयाअर्थाने स्वच्छतेचे मोठे आव्हान सांगली महापालिकेसमोर होते. अशा संकटसमयी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राज्यातील नगरपालिका सांगलीकरांच्या मदतीला धावून आल्या. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सफाई कामगार व अधिकाºयांचे पथक सांगलीला पाठविले. या पथकाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुनील सरदार व स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई महापालिकेचे ४०० कर्मचारी व ५० वाहनचालक, १२ डंपर, ७ सक्शन व जेटिंग व्हॅन, २ जेसीबी, ३ स्मॉल अर्थमुव्हर यंत्रे असा सर्व ताफा मुंबईतून १२ आॅगस्ट रोजी रात्रीतच सांगलीमध्ये दाखल झाला.

सांगलीचे आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी या पथकाचे स्वागत करून पूरबाधित क्षेत्राची माहिती दिली. १३ आॅगस्ट रोजी मुंबईच्या अधिकाºयांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी करून प्राथमिक आराखडा तयार केला. त्यानुसार ५० कर्मचाºयांची सात पथके तयार करून एकाच वेळी सात ठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. या पथकाने पहिल्या दिवशी २०० टन कचरा उचलला. सात सक्शन व्हॅनच्या मदतीने शहरामध्ये साचलेले पाणी, तुंबलेली ड्रेनेज व सेप्टीक टँक, मलनि:सारण वाहिन्या स्वच्छ करुन ७०० ते ७५० टन मैलायुक्त पाणी कचरा डेपोकडे रवाना केले.पाणी ओसरल्या भागात चिखल व कचरा रस्त्यावर पडला होता. हा परिसर स्वच्छ करणे आव्हानात्मक बाब होती. पण ४५० कर्मचाºयांच्या मदतीने हे आव्हानही त्यांनी लिलया पेलले. १५ आॅगस्ट रोजी साधारणत: ७० टक्के परिसर स्वच्छ झाला होता. १६ रोजी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिक घरी, दुकानांकडे परतू लागले. परिणामी घरातील व दुकानातील साहित्य, फर्निचर, कपडे, पुस्तके, सडलेले खाद्यपदार्थ आदीमुळे शहरामध्ये कच-याचे ढीग व दुर्गंधी पसरली होती. ही परिस्थिती पाहून मुंबईच्या पथकाचा मुक्काम आणखी दोन ते तीन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला.

दि. १७ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील बाजारपेठा, रहिवासी विभाग व बफरझोनमध्ये स्वच्छता केली. या पथकाने जवळपास साडेतीन हजार टन कचरा उचलून तो डेपोवर पोहोचविला होता. या कर्मचा-यांच्या राहण्याची, भोजन व नाष्ट्याची जबाबदारी शाखा अभियंता वैभव वाघमारे व त्यांच्या सहका-यांनी पार पाडली. अखेर सांगलीच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देऊन मुंबई महापालिकेचे पथक परतले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरMumbaiमुंबईMuncipal Corporationनगर पालिका