शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

अंगणवाडीसेविकांचा सांगलीत संताप-- थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:10 IST

सांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देपंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणीगणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री जर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे ऐकत नसतील तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर कार्याध्यक्षा मंगला सराफ आणि आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून संप सुरु केला आहे. मानधनवाढीबाबत सरकारकडून चालढकलपणा सुरु आहे. सेविका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीने सेविकांना अडीच हजार, तर मदतनीसांना अठराशे रुपयांची मानधन वाढ सुचविली आहे. हा प्रस्ताव अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि महिला बालकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे याबाबत सातत्याने बैठका होत आहेत. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही. मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस महिला बालकल्याण मंत्र्यांचे ऐकत नसतील, तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्षा सराफ यांनी केली.

कृती समितीने बेमुदत संपाचा निर्णय कायम ठेवला असून, जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्या बंद आहेत. कोणत्याही शासकीय बैठकांना उपस्थित रहायचे नाही व मासिक अहवालही द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. एक एप्रिलला दिलेल्या संपाच्या नोटिसीची दखल घेतली नाही.२० जुलैला मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. २५ जुलैला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला; मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही. गणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही. अंगणवाडी कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर राबवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.

मानधन वाढीचा निर्णय झाल्याशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, उपाध्यक्षा नादिरा नदाफ, अरुणा झगडे, कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभुते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, मंगलताई पाटील, शालन मोहिरे, विद्या कांबळे, संगीता तवरे, सुरेखा लोहार, मिनाज मुलाणी, सुहासिनी पवार, जयश्री चंदनशिवे तसेच सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार : मंगला सराफअंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने पोषण आहार देण्याचे काम बंद आहे. कुपोषित बालकांचा आहारही थांबला आहे. अंगणवाडीच्या किल्ल्या सेविका आणि मदतनीसांना तात्काळ देण्यात याव्यात, असे आदेश महिला बालकल्याणच्या आयुक्तांनी दिले आहेत. मात्र मानधनाचा प्रश्न सुटल्याशिवाय किल्ल्या दिल्या जाणार नाहीत. सरकारकडून अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रश्न तात्काळ सुटला नाही, तर कुपोषण वाढण्याची भीती आहे. कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समितीच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ यांनी दिला.