शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचा सांगलीत संताप-- थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:10 IST

सांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देपंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणीगणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने शनिवारी सांगलीत थाळीनाद आंदोलनातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री जर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे ऐकत नसतील तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.कृती समितीच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर कार्याध्यक्षा मंगला सराफ आणि आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून संप सुरु केला आहे. मानधनवाढीबाबत सरकारकडून चालढकलपणा सुरु आहे. सेविका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीने सेविकांना अडीच हजार, तर मदतनीसांना अठराशे रुपयांची मानधन वाढ सुचविली आहे. हा प्रस्ताव अद्याप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि महिला बालकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे याबाबत सातत्याने बैठका होत आहेत. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही. मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस महिला बालकल्याण मंत्र्यांचे ऐकत नसतील, तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्षा सराफ यांनी केली.

कृती समितीने बेमुदत संपाचा निर्णय कायम ठेवला असून, जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्या बंद आहेत. कोणत्याही शासकीय बैठकांना उपस्थित रहायचे नाही व मासिक अहवालही द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. एक एप्रिलला दिलेल्या संपाच्या नोटिसीची दखल घेतली नाही.२० जुलैला मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. २५ जुलैला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला; मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही. गणपती उत्सवसारख्या महत्त्वाच्या सणालासुध्दा मानधन मिळाले नाही. अंगणवाडी कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर राबवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.

मानधन वाढीचा निर्णय झाल्याशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, उपाध्यक्षा नादिरा नदाफ, अरुणा झगडे, कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभुते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, मंगलताई पाटील, शालन मोहिरे, विद्या कांबळे, संगीता तवरे, सुरेखा लोहार, मिनाज मुलाणी, सुहासिनी पवार, जयश्री चंदनशिवे तसेच सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार : मंगला सराफअंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरु असल्याने पोषण आहार देण्याचे काम बंद आहे. कुपोषित बालकांचा आहारही थांबला आहे. अंगणवाडीच्या किल्ल्या सेविका आणि मदतनीसांना तात्काळ देण्यात याव्यात, असे आदेश महिला बालकल्याणच्या आयुक्तांनी दिले आहेत. मात्र मानधनाचा प्रश्न सुटल्याशिवाय किल्ल्या दिल्या जाणार नाहीत. सरकारकडून अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रश्न तात्काळ सुटला नाही, तर कुपोषण वाढण्याची भीती आहे. कुपोषण वाढल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समितीच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ यांनी दिला.