शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

क्रिकेट वादातून सांगलीत हाणामारी

By admin | Updated: February 20, 2017 23:57 IST

दोघे जखमी : असीफ बावा-टोल्या पोतदार गटात जुंपली; आठ जणांना अटक

सांगली : क्रिकेट सामना बरोबरीत सोडविल्याच्या वादातून खणभागातील असीफ बावा व पंचमुखी मारुती रस्त्यावरील टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार यांच्या दोन गटांत जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करून, घरात घुसून तलवारीचा धाक दाखविण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या ३७ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. बावा गटाच्या आठजणांना अटक केली आहे.अटक केलेल्यांमध्ये सलमान असीफ बावा (वय २९), हंजल असीफ बावा (२२), अब्बुबक्कर हुसेन जमादार (२१), साजीस कबीर मगदूम (२६), नईम सिकंदर पटवेगार (२३), फिरासत फक्रुद्दीन शेख (२०, सर्व रा. मकानदार गल्ली, खणभाग) व अकीब इसाक बाणदार (२६, नगारजी गल्ली, खणभाग, सांगली) यांचा समावेश आहे. रात्री टोल्या पोतदार गटाची पहिली फिर्याद दाखल केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी बावा गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे.रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. रात्री दहा वाजता अंतिम सामना असीफ बावा व टोल्या पोतदार यांच्या गटात झाला. पण हा सामना बरोबरीत सोडविला गेला. यातून दोन्ही गटांत वाद झाला होता. हा वाद मिटविण्यात आला होता. तरीही रात्री उशिरा त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला व दोन्ही गट आमने-सामने आले. टोल्या पोतदार गटाकडून धनंजय अरुण पोतदार (३६, खणभाग कणसे गल्ली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार असीफ बावा यांच्या मुलांसह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रिकेट वादातून बावा यांच्या मुलांनी बेकायदा जमाव जमवून घराजवळ येऊन मारहाण केली, घरावर दगडफेक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. बावा गटाकडून अर्षद दिलावर पेटकर (२३, रा. अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार, दिलावर जमादार, अवधुत शिंदे, अस्लम शेख-कबुतरवाला, पप्पू जोगळेकर, अण्णा पाटील, अभिजित चव्हाण व २० अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील कोणालाही अद्याप अटक केलेली नाही. क्रिकेटचा सामना संपल्यानंतर असीफ बावा यांना सोडण्यासाठी अर्षद पेटकर खणभागात गेला होता. त्यावेळी संशयित तिथे आले व त्यांनी अर्षदला गाडीवर बसण्यास सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यामुळे संशयितांनी त्यास बॅटने हातावर तसेच पायावर मारहाण केली. तसेच बावा यांच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखविला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटात जोरदार मारामारी झाल्याचे समजताच शहर पोलिसांची पळापळ झाली. खणभाग, पंचमुखी मारुती रस्त्यावर पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)