शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी वाळू लागल्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:40 IST

सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ...

सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ग्रीन स्पेसची संकल्पना राबवित जवळपास २१ ठिकाणी छोट्या बागा विकसित केल्या. पण आता नव्या बागांसह जुन्या बागांमध्येही पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने बागांची देखभाल, दुरुस्तीही रामभरोसे आहे. यंदाच्या सुटीत मुलांना या बागांत खेळण्या-बागडण्याचा आनंद घेता येणार नाही, असेच चित्र आहे.महापालिकेच्या ३० बागा आहेत. महापालिकेच्यावतीने गेल्या दोन वर्षात २१ खुल्या भूखंडांवर ग्रीन स्पेस विकसित करण्यात आले. त्यासाठी साडेचार कोटीचा निधी खर्च झाला आहे. यापैकी १६ ग्रीन स्पेस पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. उपनगरांत ही ग्रीन स्पेस (छोट्या बागा) उभारल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला. नव्या वर्षात प्रत्येक प्रभागात एक बाग, याप्रमाणे नवीन २० बागा उभारण्याचे नियोजनही उद्यान विभागाने केले आहे. एकीकडे बागांची संख्या वाढत असताना, सध्या अस्तित्वातील बागा वाचविण्यासाठीही धावपळ उडाली आहे.सध्या अनेक बागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सरस्वतीनगर, सावरकर कॉलनी, चाणक्यपुरीसह दोन ते तीन बागांमधील कूपनलिका ठणठणीत कोरड्या पडल्या आहेत. महावीर उद्यानातील कूपनलिकाही बंद आहे. काळ्या खणीतून त्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. पण खणीतील पाणीही सिंचनासाठी योग्य नाही. ग्रीन स्पेसची जबाबदारी आज तरी ठेकेदाराकडे आहे. तिथेही कूपनलिकांची सोय केली आहे. काही कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ठेकेदारालाही बागा जिवंत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.उद्यान विभागाकडे केवळ एकच टँकर उपलब्ध आहे. या टँकरमधून बागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात पुतळे, रस्त्याकडेची झाडे यांच्यासह नगरसेवकांनी मागणी केल्यास टँकर द्यावा लागतो. त्यामुळे एक टँकर उद्यान विभागाला पुरेसा नाही. त्यात बागांसाठी पिण्याचे पाणी वापरता येत नाही. त्यामुळे उद्यान विभागाला स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी लागते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरात बाग उभारण्याची मागणी केली जात आहे. पण तिथे पाण्याची व्यवस्था नाही. त्यात बागकामासह इतर कामासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. गेल्या दीड वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरवठा झालेला नाही. त्याच्या निविदेची फाईल वरिष्ठांच्या टेबलावर धूळ खात पडली आहे. अशा अनेक अडचणीतून सध्या उद्यान विभाग मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे हिरवाई फुलविण्याचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.