शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

पाण्याअभावी वाळू लागल्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:40 IST

सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ...

सांगली : शाळा, क्लासेस, अभ्यास यात गुरफटून पडलेल्या मुलांना सुटीचा आनंद लुटण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे शहरातली बागा. महापालिकेनेही यंदा ग्रीन स्पेसची संकल्पना राबवित जवळपास २१ ठिकाणी छोट्या बागा विकसित केल्या. पण आता नव्या बागांसह जुन्या बागांमध्येही पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने बागांची देखभाल, दुरुस्तीही रामभरोसे आहे. यंदाच्या सुटीत मुलांना या बागांत खेळण्या-बागडण्याचा आनंद घेता येणार नाही, असेच चित्र आहे.महापालिकेच्या ३० बागा आहेत. महापालिकेच्यावतीने गेल्या दोन वर्षात २१ खुल्या भूखंडांवर ग्रीन स्पेस विकसित करण्यात आले. त्यासाठी साडेचार कोटीचा निधी खर्च झाला आहे. यापैकी १६ ग्रीन स्पेस पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. उपनगरांत ही ग्रीन स्पेस (छोट्या बागा) उभारल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला. नव्या वर्षात प्रत्येक प्रभागात एक बाग, याप्रमाणे नवीन २० बागा उभारण्याचे नियोजनही उद्यान विभागाने केले आहे. एकीकडे बागांची संख्या वाढत असताना, सध्या अस्तित्वातील बागा वाचविण्यासाठीही धावपळ उडाली आहे.सध्या अनेक बागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सरस्वतीनगर, सावरकर कॉलनी, चाणक्यपुरीसह दोन ते तीन बागांमधील कूपनलिका ठणठणीत कोरड्या पडल्या आहेत. महावीर उद्यानातील कूपनलिकाही बंद आहे. काळ्या खणीतून त्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. पण खणीतील पाणीही सिंचनासाठी योग्य नाही. ग्रीन स्पेसची जबाबदारी आज तरी ठेकेदाराकडे आहे. तिथेही कूपनलिकांची सोय केली आहे. काही कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ठेकेदारालाही बागा जिवंत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.उद्यान विभागाकडे केवळ एकच टँकर उपलब्ध आहे. या टँकरमधून बागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यात पुतळे, रस्त्याकडेची झाडे यांच्यासह नगरसेवकांनी मागणी केल्यास टँकर द्यावा लागतो. त्यामुळे एक टँकर उद्यान विभागाला पुरेसा नाही. त्यात बागांसाठी पिण्याचे पाणी वापरता येत नाही. त्यामुळे उद्यान विभागाला स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी लागते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरात बाग उभारण्याची मागणी केली जात आहे. पण तिथे पाण्याची व्यवस्था नाही. त्यात बागकामासह इतर कामासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. गेल्या दीड वर्षापासून ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरवठा झालेला नाही. त्याच्या निविदेची फाईल वरिष्ठांच्या टेबलावर धूळ खात पडली आहे. अशा अनेक अडचणीतून सध्या उद्यान विभाग मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे हिरवाई फुलविण्याचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.