शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जत पालिकेत बेकायदा ठरावांना मंजुरी

By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST

मोरे, कुलकर्णी यांचा आरोप : स्वार्थी आणि सोयीचे राजकारण असल्याची टीका

जत : विधानसभा निवडणुकीनंतर जत नगरपालिकेत स्वार्थी आणि सोयीचे राजकारण सुरु झाले आहे. ज्या बेकायदेशीर ठरावांना मासिक सभेत तत्कालीन उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी विरोध करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती, ते सर्वच ठराव आता एकमताने आणि सर्वसंमतीने सत्ताधारी गटाकडून मंजूर केले जात आहेत, असा आरोप नगरपरिषदेतील विरोधी गटनेते परशुराम मोरे व नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत केला.दलित वस्ती सुधार योजना, तेरावा वित्त आयोग, रस्ते आणि गटार दुरुस्ती व नगरोत्थान योजनेसाठी शासनाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेस मिळाला आहे. परंतु योग्य नियोजन होत नसल्यामुळे हा निधी मागील एका वर्षापासून पडून आहे. त्यामुळे जत शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत. वीस लाख रुपये खर्च करुन नगरपालिकेने ५६ कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. पण मागील वर्षभरापासून त्या तशाच पडून आहेत. त्यांचा वापर होत नसल्यामुळे त्यांना गंज चढू लागला आहे. कचरा उचलण्यासाठी कंटेनर नाही, म्हणून कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या नाहीत, असे उत्तर प्रशासनाकडून दिले जात आहे. कंटेनर खरेदी करण्यापूर्वी कचरा कुंड्याच का खरेदी करण्यात आल्या आहेत? यामागील नेमके गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.मासिक सभेचे इतिवृत वेळेवर लिहिले जात नाही. मासिक बैठकीत साधकबाधक प्रश्नावर चर्चा केली जाते. महत्त्वाचे विषय पत्रिकेवर घेतले जात नाहीत. ते ऐनवेळी घेतले जात आहेत. ज्या विषयावर मासिक बैठकीत चर्चा केली जाते, ते विषय सोडून, इतर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेले विषय इतिवृत्तांतामध्ये ऐनवेळी घुसडण्यात येत आहेत. मासिक सभेत संमत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत नगरसेवकांना मागणी करुनही दिली जात नाही. त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज दहा टक्के नियमानुसार आणि नव्वद टक्के बेकायदेशीर सुरु आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.कार्यालयीन कर्मचारी उच्चशिक्षित नाहीत, तरीही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरपालिका मुख्याधिकारी अभ्यासू नाहीत. ते शिकाऊ आहेत. पालिकेतील कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे कार्यालयीन कामाच्या वेळेत येथे नेहमी सन्नाटा असतो. कार्यालयीन कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी हेलपाटे मारावे लागत आहेत. वसंतदादा विकास आघाडीप्रमुख सुरेश शिंदे यांनी राजकीय स्वार्थासाठी उमेश सावंत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर परिवर्तन पॅनेलच्या नगरसेवकांची मदत घेऊन तो मंजूर करून घेतला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, शहरातील डिजिटल फलकांना फी आकारणी केली जात नाही, त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. त्यांना कर आकारणी केली जात नाही. तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी गटाने त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. नगरपालिका कामकाजात यापुढे सुधारणा झाली नाही, तर परिवर्तन पॅनेलचे नगरसेवक आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगरसेवक संजय शिंदे, बेबीताई चव्हाण, गिरमल कांबळे, विनय बेळंखी, संतोष कोळी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)