शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

जत पालिकेत बेकायदा ठरावांना मंजुरी

By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST

मोरे, कुलकर्णी यांचा आरोप : स्वार्थी आणि सोयीचे राजकारण असल्याची टीका

जत : विधानसभा निवडणुकीनंतर जत नगरपालिकेत स्वार्थी आणि सोयीचे राजकारण सुरु झाले आहे. ज्या बेकायदेशीर ठरावांना मासिक सभेत तत्कालीन उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी विरोध करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती, ते सर्वच ठराव आता एकमताने आणि सर्वसंमतीने सत्ताधारी गटाकडून मंजूर केले जात आहेत, असा आरोप नगरपरिषदेतील विरोधी गटनेते परशुराम मोरे व नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत केला.दलित वस्ती सुधार योजना, तेरावा वित्त आयोग, रस्ते आणि गटार दुरुस्ती व नगरोत्थान योजनेसाठी शासनाकडून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेस मिळाला आहे. परंतु योग्य नियोजन होत नसल्यामुळे हा निधी मागील एका वर्षापासून पडून आहे. त्यामुळे जत शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत. वीस लाख रुपये खर्च करुन नगरपालिकेने ५६ कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. पण मागील वर्षभरापासून त्या तशाच पडून आहेत. त्यांचा वापर होत नसल्यामुळे त्यांना गंज चढू लागला आहे. कचरा उचलण्यासाठी कंटेनर नाही, म्हणून कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या नाहीत, असे उत्तर प्रशासनाकडून दिले जात आहे. कंटेनर खरेदी करण्यापूर्वी कचरा कुंड्याच का खरेदी करण्यात आल्या आहेत? यामागील नेमके गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.मासिक सभेचे इतिवृत वेळेवर लिहिले जात नाही. मासिक बैठकीत साधकबाधक प्रश्नावर चर्चा केली जाते. महत्त्वाचे विषय पत्रिकेवर घेतले जात नाहीत. ते ऐनवेळी घेतले जात आहेत. ज्या विषयावर मासिक बैठकीत चर्चा केली जाते, ते विषय सोडून, इतर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेले विषय इतिवृत्तांतामध्ये ऐनवेळी घुसडण्यात येत आहेत. मासिक सभेत संमत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत नगरसेवकांना मागणी करुनही दिली जात नाही. त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज दहा टक्के नियमानुसार आणि नव्वद टक्के बेकायदेशीर सुरु आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.कार्यालयीन कर्मचारी उच्चशिक्षित नाहीत, तरीही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरपालिका मुख्याधिकारी अभ्यासू नाहीत. ते शिकाऊ आहेत. पालिकेतील कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे कार्यालयीन कामाच्या वेळेत येथे नेहमी सन्नाटा असतो. कार्यालयीन कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी हेलपाटे मारावे लागत आहेत. वसंतदादा विकास आघाडीप्रमुख सुरेश शिंदे यांनी राजकीय स्वार्थासाठी उमेश सावंत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर परिवर्तन पॅनेलच्या नगरसेवकांची मदत घेऊन तो मंजूर करून घेतला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, शहरातील डिजिटल फलकांना फी आकारणी केली जात नाही, त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. त्यांना कर आकारणी केली जात नाही. तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी गटाने त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. नगरपालिका कामकाजात यापुढे सुधारणा झाली नाही, तर परिवर्तन पॅनेलचे नगरसेवक आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगरसेवक संजय शिंदे, बेबीताई चव्हाण, गिरमल कांबळे, विनय बेळंखी, संतोष कोळी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)