शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वीज कनेक्शन तोडल्यास जशास तसे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST

ऐतवडे बुद्रुक : घरगुती व शेती पंपाचे वीजबिल माफ न करता महावितरणच्यावतीने वीजबिल भरण्यासाठी जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडण्याचे ...

ऐतवडे बुद्रुक : घरगुती व शेती पंपाचे वीजबिल माफ न करता महावितरणच्यावतीने वीजबिल भरण्यासाठी जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. असे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तरी वीज कनेक्शन तोडणाऱ्यांना जशास तसे उत्तर म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शहाजी गायकवाड व परिसरातील शेतकरी यांनी निवेदनाद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी सर्व शेतकरी व घरगुती वीज धारकांच्यावतीने वीजबिल माफ करावे, यासाठी आंदोलन केले होते. त्याअनुषंगाने शासनाने वीज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी जबरदस्तीने घरगुती व शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. तरी या जबरदस्तीला जशास तसे आंदोलन करून उत्तर दिले जाईल. तरी शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक सोसायटी नंबर १ चे माजी अध्यक्ष शहाजी गायकवाड व शेतकाऱ्यांनी दिला आहे.