शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

संभाजीराजेंना नेले होते मिरज, शिराळामार्गे

By admin | Updated: May 14, 2016 00:51 IST

बहादूरगडचा प्रवास : खानापूरचा भूपाळगडही पदस्पर्शाने पावन

सचिन लाड / सांगली कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाच्या सेनेने पकडले. फेब्रुवारी १६८९ मध्ये बहादूरगड (ता. श्रीगोंदा) येथे राजेंना नेण्याचा सुरु झालेला प्रवास मिरज व शिराळामार्गे झाला होता. याठिकाणच्या किल्ल्यात त्यांना आणले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. मिरज व शिराळाप्रमाणे खानापूर-आटपाडी सीमेवरील बाणूरगड (भूपाळगड)ही राजेंच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंचा १४ मेरोजी जन्मदिन आहे. १६८९ मध्ये राजेंचे कोकणातील संगमेश्वर येथे वास्तव्य होते. त्यावेळी औरंगजेबाने दख्खनची मोहीम काढली होती. मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी त्याची ही मोहीम होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी राजेंची रायगडला जाण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने फौजफाट्यासह संगमेश्वर येथे हल्ला केला. त्यावेळी राजेंकडे कमी प्रमाणात सरदार होते. खानाला राजेंना पकडण्यात यश आले. राजेंना पुढे बहादूरगड येथे नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना नेण्याचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात राजेंना मिरज व शिराळा येथील किल्ल्यांमध्ये आणण्यात आले होते. मुघलांची राजवट असल्याने येथे आणण्यात आले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. राजेंच्या पदस्पर्शाने ही दोन्ही गावे पावन झाली आहेत. मात्र संगमेश्वर ते बहादूरगड या प्रवासात राजेंना कोणत्या मार्गाने नेले, याबद्दलही इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत.