शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

संभाजी पवार वाघाप्रमाणे लढले अन् जिंकलेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत संभाजी पवार हे एखाद्या वाघाप्रमाणे लढले आणि जिंकलेही, असे प्रतिपादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत संभाजी पवार हे एखाद्या वाघाप्रमाणे लढले आणि जिंकलेही, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीत व्यक्त केले.

येथील अमरधाम स्मशानभूमीत बुधवारी सकाळी शोकसभा घेण्यात आली. यावेळी आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, भगवानराव साळुंखे, हिंदकेसरी पै. दीनानाथसिंह, हिंदकेसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नामदेवराव माेहिते, दीपक शिंदे, आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले की, चार वेळा आमदार होऊनही आप्पांचे राहणीमान व वागणे साधे होते. आप्पा आणि डॉ. पतंगराव कदम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आप्पांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला पतंगराव कदम आले होते. मानसन्मानाच्या ते कधी भानगडीत नसायचे. कुस्ती म्हणजे त्यांचा श्वास होता.

सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आप्पा लढले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लढाई त्यांनी उभी केली. कुस्तीप्रेमींना त्यांची आठवण सतत व्हावी म्हणून अप्पांचे उचित स्मारक होणे गरजेचे आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले की, अप्पांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. त्यांनी सर्वसामान्यांसाठी राजकारण केले. आमदार विक्रम सावंत म्हणाले की, आम्हाला विधिमंडळात त्यांची भाषणे वाचायला मिळतात. सर्वसामान्यांचा ते विधिमंडळातील खराखुरा आवाज होते.

शरद पाटील म्हणाले की, तब्बल ४४ वर्षांचा आमचा स्नेह होता. बंगल्यातील राजकारण रस्त्यावर आणायचे काम अप्पा आणि व्यंकाप्पांनी केले. आज शेतकरी संघटना बऱ्याच झाल्या आहेत, ऊस उत्पादकांसाठी लढणारेही अनेक आहेत; परंतु त्याची सुरुवात अप्पांनी सांगलीतून केली.

भगवानराव साळुंखे म्हणाले की, गरिबांचा कैवारी म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वोदय कारखान्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

दिलीपतात्या पाटील म्हणाले की, १९७७ ला जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर राजारामबापूंनी त्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर संभाजी पवार, व्यंकप्पा पत्की, शरद पाटील यांनीही प्रवेश केला. बापूंनी अप्पांना जनता दलाचे अध्यक्षपद दिले. बापूंवरील चांगल्या-वाईट प्रसंगात ते तिघेही बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

यावेळी श्रीमंत कोकाटे, प्रा. सुकुमार कांबळे, अरुण दांडेकर, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, डॉ. जितेश कदम, भीमराव माने, हणमंत पवार, मंगेश चव्हाण, कुस्ती निवेदक शंकर पुजारी, सुब्राव मद्रासी, मानसिंग शिंदे, आदी उपस्थित होते.

चौकट

ही उपाधी आता कोणालाही नाही

हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले की, 'बिजलीमल्ल' ही उपाधी यापुढे कोणाला मिळेल असे वाटत नाही. इतिहास बनविणारा कधीही जात नाही. त्यामुळेच ते आपल्या मनातून कधीही जाणार नाहीत.