शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प रखडला

By admin | Updated: December 17, 2014 23:01 IST

कसबे डिग्रजमधील स्थिती : ठेकेदाराची मनमानी; जलसंपदा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

सोमनाथ डवरी- कसबे डिग्रज -राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून कसबे डिग्रजमध्ये १०६५ हेक्टरचा सच्छिद्र निचरा प्रणाली क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प सुरू आहे. खा. राजू शेट्टी आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दोन कोटी दहा लाख रुपये सुधारित कामासाठी मंजूर झाले आहेत. या कामांत मुख्य चरीचे काम ठेकेदारांच्या मनमानीने सुरू होते. तसेच प्रत्येक वेळी नवनवीन येणारे जलसंपदा विभागाचे अधिकारी ‘टाईमपास’ करीत हेतुपुरस्सर काम लांबवत असल्याची चर्चा सुरू आहे.२००४-२००५ मध्ये १०६५ हेक्टरचा प्रकल्प मंजूर झाला होता. त्यापैकी ५८७ हेक्टरचे सच्छिद्र निचरा प्रणाली पूर्ण करण्यात आली आहे. त्याठिकाणी काही शेतकरी पिके घेत आहेत. उर्वरित ४७८ हेक्टरचे काम बाकी आहे. हे काम करण्यासाठी आणि सुधारित प्रकल्पासाठी शासनाचा निधी मंजूर आहे. सुधारित काम करताना सच्छिद्र निचरा प्रणालीच्या पाईप वाढविणे, ‘मुख्य चरींची’ संख्या वाढविणे, खोली वाढविणे, दगडी पिचिंग करणे आवश्यक ठिकाणी सी डी वर्क करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे सच्छिद्र पाईपमधून क्षारयुक्त पाण्याचा लवकर निचरा होऊन शिवारात लवकर सुधारणा होईल. पण अनावश्यक ठिकाणी सी डी वर्क का आहेत, त्याचप्रमाणे विकसित भागातील मुख्य चरीची देखभाल दुरुस्ती, जी ती संस्था करीत आहे, पण किरकोळ कामासाठी कंत्राटदार-अधिकारी संगनमताने साफसफाई, काटेरी झुडपे पाणकणीस काढण्यासाठी लाखोचा खर्च दाखवत आहेत. ठेकेदार रक्कम अनावश्यक ठिकाणी रात्री-अपरात्री काम करताना हे काम सरपंच आणि शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. चरखुदाईमध्ये ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे.पाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी हे काम टाळण्यासाठी प्रयत्न करतात, असे पीडित शेतकऱ्यांचे मत आहे. अधिकारी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी ठेकेदाराची मनमानी खपवून घेत आहेत. गेले कित्येक दिवस काम रखडले आहे. त्याबाबत माहिती अधिकाराचा वापर करून पुरेशी माहिती घ्यावी लागत आहे.पूर्वीच्या मंजूर निधीतील सुमारे २ कोटी २० लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील २ कोटी १० लाख असा निधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील २ कोटी २० लाख असा निधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी भरले आहेत; पण काम जाणीवपूर्वक टाळले जात आहे. लाखो रुपयांची बिले अधिकारी-ठेकेदार संगनमताने उकळत आहेत. हे काम तात्काळ सुरू करावे, नकाशाप्रमाणे नियमित दर्जेदार काम व्हावे, असे क्षारपडग्रस्तांचे मत आहे. या कामात खा. राजू शेट्टी व आ. जयंत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. अधिकारी-ठेकेदारांचे संगनमतपाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी हे काम टाळण्यासाठी प्रयत्न करतात, असे पीडित शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी भरले आहेत; पण काम जाणीवपूर्वक टाळले जात आहे. तसेच लाखो रुपयांची बिले अधिकारी-ठेकेदार संगनमताने उकळत आहेत, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.