शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

रेशनचे धान्य विक्रीला; स्वस्तात होतेय खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कायम असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुरते बाधित झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कायम असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुरते बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत असले तरी हेच धान्य आता विकलेही जाऊ लागले आहे. गेल्यावर्षी पोलिसांनी राईस मिलवर कारवाई, तांदूळ पकडला असला तरी आता मात्र, लाभार्थींकडेच धान्य अधिक झाल्याने अनेकजणांनी विक्रीचा फंडा अवलंबवला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह राज्य शासनाकडूनही लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत दिले जात आहे. कुटुंबातील सदस्य संख्या कमी असल्याने अनेकांकडे धान्य शिल्लक राहत आहे. त्यामुळे अगदी नाममात्र किमतीत या धान्याची विक्री होते आहे. प्रशासनाला याबाबत कारवाई करण्यासही अडचणी येत आहेत.

चौकट

इडली, डोसासाठी तांदूळ

इतर कोणत्याही तांदळापेक्षा रेशनच्या तांदळापासून इडली व डोसा चांगला तयार होत असल्याची भावना असल्याने अनेकजण केवळ यासाठी तांदूळ विकत घेत आहेत, तर काही दुकानदार गहू इतर गव्हांमध्ये मिक्स करण्यासाठी खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

चौकट

जादाचे धान्यामुळे अडचण

शासनाकडून दुर्बल घटकांना नियमितपणे धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात खंड न पडल्याने अनेक जणांकडे धान्याची साठवणूक झाली आहे. हे धान्य खराब होण्यापेक्षा त्याची विक्री करण्यात येत आहे.

चौकट

गव्हाऐवजी ज्वारी

लाभार्थ्यांना गहू वाटप होत असले तरी प्रत्यक्षात अनेकजण चपातीऐवजी भाकरी खाणेच पसंत करतात. त्यामुळे काही लाभार्थी गव्हाची विक्री करून त्यातून ज्वारीची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

कोट

शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा त्यांच्यासाठी होत असला तरी त्याची विक्री करणे चुकीचे आहे. त्याशिवाय या धान्याचा गैरवापर करणाऱ्यावर यापूर्वी कारवाई झाली आहेत यापुढेही तथ्य आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी.