शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नातेवाईकांच्याच नावे घेतला पगार

By admin | Updated: August 31, 2014 23:35 IST

जत तालुक्यातील चित्र : युपीएस वाटपात गोलमाल

जयवंत आदाटे - जत -जत पंचायत समिती संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या विभागाच्यावतीने देण्यात येणारा युपीएस (बॅटरी बॅकअप्) ११६ पैकी ५८ ग्रामपंचायतींना देण्यात आला नाही. हे युपीएस संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांच्या घरात आहेत असे समजते. एका युपीएसची किंमत सर्वसाधारणपणे वीस हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे युपीएस वाटपात अकरा लाख साठ हजार रुपयांचा गोलमाल करण्यात आला आहे, अशी चर्चा पं. स. ग्रामपंचायत विभागात दबक्या आवाजात केली जात आहे.संग्राम विभागामार्फत पंचायत समितीसाठी दोन इनव्हर्टर संच आले होते. परंतु ते पं. स.ला देण्यात आले नाहीत. पं. स. मधील प्रत्येक विभागाने स्वखर्चाने इनव्हर्टर बसवून संगणकाचे काम सुरू केले आहे. एक हजार लोकसंख्या असलेल्या गावासाठी एक संगणक डेटा आॅपरेटर नियुक्त करावा, असा शासकीय नियम आहे. परंतु संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांनी चार-पाच गावांसाठी एक डेटा आॅपरेटर नियुक्त केला आहे. ग्रामपंचायतीची संपूर्ण कामे हे डेटा आॅपरेटर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन करीत नाहीत. संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकांकडून दफ्तर मागवून घेऊन पंचायत समिती संग्राम कार्यालयात बसूनच काम केले जात आहे. याचा त्रास ग्रामसेवकांना व ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमध्ये डेटा आॅपरेटर म्हणून कोण काम करत आहे, याची माहिती सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना नसते. परंतु त्यांचा मासिक पगार नियमित काढला जात आहे. ग्रामसेवकांनी डेटा आॅपरेटरची मागणी केल्यानंतर, तुमचे दफ्तर येथेच आणा असे त्यांना सांगितले जाते. दफ्तर वेळेत देऊनही डेटा आॅपरेटरची संख्या कमी असल्यामुळे वेळेत माहिती आॅनलाईन अपलोड होत नाही. त्यानंतर अधिकारी ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रार करत आहेत.एका डेटा आॅपरेटरकडे तीन—चार ग्रामपंचायतींची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे जादा कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यांनी जादा काम करण्यास नकार दिला, तर तुमची इतरत्र बदली करतो किंवा तुम्हाला कामावरून कमी करतो, अशी भीती घालून त्यांच्याकडून जादा काम संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी करून घेत आहेत. संग्राम विभागात सध्या कार्यरत असलेल्या डेटा आॅपरेटरच्या यादीत पुकार आवटी यांचे जवळचे नातेवाईक असलेल्यांची जादा नावे आहेत. हे नातेवाईक प्रत्यक्ष कामावर येत नाहीत. त्यांचे काम इतर डेटा आॅपरेटरना करावे लागत आहे. परंतु त्यांचा मासिक पगार मात्र पुकार आवटी घेत आहेत. या डेटा आॅपरेटर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास येथील गैरकारभार उजेडात येणार आहे. (उत्तरार्ध)शासनाची फसवणूक...संग्राम विभागाच्यावतीने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला मागील तीन वर्षात संगणक प्रिंटरची शाई, स्टेशनरी, कार्टेज व इतर आवश्यक साहित्य आणि संगणक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परंतु हे सर्व कागदोपत्री काम झाले आहे असे दाखवून त्यावर ग्रामसेवकांची सही घेऊन दरमहा लाखो रुपयांचे बिल काढून महाआॅनलाईन कंपनी व शासनाची फसवणूक जत पं. स. संग्राम विभागाकडून केली जात आहे. एखाद्या ग्रामसेवकाने अशा बनावट बिलावर सही करण्यास नकार दिला, तर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडून पुकार आवटी दबाव आणून त्याला सही करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे काही प्रामाणिक ग्रामसेवकही हतबल होत आहेत. स्थानिक पातळीवरून संग्राम विभागाला पाठीशी घातले जात असल्यामुळे त्यांची भूक जादाच वाढू लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेने त्रयस्थामार्फत या विभागाची चौकशी केल्यास येथील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.