शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव तालुक्यात ज्ञानरचनावादी शिक्षणाचा श्रीगणेशा

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

जिल्हा परिषद शाळांचे एक पाऊल पुढे : तालुक्यातील पहिलीच्या १४२ शाळांत अंमलबजावणी - गुड न्यूज

दत्ता पाटील-- तासगाव--काही वर्षांपूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सीलने व्हायचा. अलीकडच्या काळात हे साहित्य इतिहासजमा झाले. त्याची जागा वही-पेनने घेतली. याहीपुढे जात काही शाळांत डिजिटल शिक्षण पध्दतीची सुरुवात झाली. मात्र तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिकवण्याच्या पध्दतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. मुलांना वही-पेनमध्ये अडकवून न ठेवता, अभ्यासक्रमाच्या रचनेवर आधारित प्रात्यक्षिक मांडणी केलेल्या शिक्षण पध्दतीचा अंगिकार केला आहे. एक जानेवारीपासून तालुक्यातील सर्व १४२ शाळांतील पहिलीच्या वर्गात नावीन्यपूर्ण ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २०१० पासून अंमलबजावणी करण्यात आली. मुलांच्या क्रियाशीलतेला वाव देऊन, मुलांनी स्वत: क्रिया करुन नव्याने ज्ञानाची निर्मिती करावी, या उद्देशाने शिक्षण पध्दतीला सुरुवात झाली. मात्र अपवाद वगळता प्रत्यक्षात कोठेच अंमलबजावणी दिसून आली नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील कुमठे केंद्रातील शाळांतून ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीने मुलांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून आला. त्यानंतर राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्ञानरचनावाद पध्दतीवर लक्ष केंद्रित केले.कुमठे पॅटर्ननुसार तासगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, या हेतूने तासगावातील ढवळी आणि मणेराजुरी जिल्हा परिषदेच्या शाळांत ज्ञानरचनावादाच्या मॉडेल शाळा तयार करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिलीत शिकविणाऱ्या शिक्षकांच्या बारावेळा कार्यशाळा घेण्यात आल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा यशस्वी ठरल्यानंतर एक जानेवारीपासून तालुक्यातील सर्व पहिलीच्या वर्गात ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे लवकरच जिल्ह्यात ज्ञानरचनावादाचा तासगाव पॅटर्न तयार होणार हे निश्चित.अशी झाली सुरुवात कुमठे पॅटर्नचा आदर्श नजरेसमोर ठेवून गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी तालुक्यातील सर्वच शाळांत ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. विस्तार अधिकारी डॉ. विमल माने आणि विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांच्या सहकार्याने नियोजन करुन एक जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात पहिलीच्या सर्व शाळांत त्याची सुरुवातदेखील केली.काय आहे ज्ञानरचनावाद प्रगत राष्ट्रांत ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीनेच शिक्षण दिले जाते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये भारतात ज्ञानरचनावाद स्वीकारण्यात आला. मुलांना कसे शिकवायचे, याऐवजी मुले कशी शिकतील, याचे उत्तर म्हणजेच ज्ञानरचनावाद. ज्ञानाची मांडणी करुन अनुभवावर नवे ज्ञान मिळवणे म्हणजेच ज्ञानरचनावाद. या पध्दतीने मुलांना केवळ शिक्षकांनी शिकवण्याऐवजी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकण्याची जबाबदारीच मुलांवर येते. अशा पध्दतीचा अवलंब झाल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारल्याचे चित्र दिसून आले आहे.