शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच पारडे जड झाल्याचे दिसत आहे.शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलेल्या फुटीरतावाद्यांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. सरकारमध्ये जाऊन मंत्रिपदावर विराजमान होताना शेतकरी चळवळीशी बेईमानी केली तर, त्याची फळे त्यांना भोगावी लागणारच. असाच प्रकार सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत घडल्याने शेतकरी नाराज होते. राजू शेट्टी यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आता त्यांनी संघटनेत लोकांना घेताना तपासून घ्यावे.- बाळासाहेब कुलकर्णी, संस्थापक नेते,शेतकरी संघर्ष परिषद, सांगलीस्वत:च्या हितासाठी संघटना चालविणाºयांचा फुगा आता फुटलेला आहे. हे कधी ना कधी होणार होतेच. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच मुळी तडजोडीच्या राजकारणावर अवलंबून आहे. सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचा मुद्दा हा व्यक्तिगत स्वार्थापोटीच्या भांडणाचा मुद्दा आहे. दोन नेत्यांमधील व्यक्तिगत वादातून ही घटना घडली आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी युती केली. त्यांच्या या युतीचा शेट्टींना कोणताच फायदा झाला नाही. त्यामुळे संघर्षाचा जन्म झाला. आंदोलनेसुद्धा स्वार्थी भावनेने केल्यामुळे आज त्यांच्या संघटनेवर ही वेळ आली आहे. भविष्यातही त्यांना अनेक परिणामांना सामारे जावे लागेल.- संजय कोले, नेते, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)चळवळीवरचा विश्वास : संपुष्टात येईलशरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे म्हणाले की, सदाभाऊंची हकालपट्टी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर, शेतकरी चळवळीची इतकी बदनामी झाली नसती. ज्यावेळी सदाभाऊंवर गंभीर आरोप होत होते, त्यावेळीही कारवाई झाली नाही. या कारवाईबरोबरच राज्य सरकारनेही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. असे लोक जर चळवळीत राहिले, तर शेतकºयांचा चळवळीवरील विश्वास उडून जाईल. सत्तेच्या मोहापायी चळवळीला वेठीस धरण्याचे काम सदाभाऊंकडून घडल्यामुळे आणि अनेकप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानेच ही कारवाई झाली आहे.शेतकरी चळवळीमध्ये धोकादायक माणसं ठेवल्यामुळे चळवळीचे नुकसान होते, याचे सदाभाऊ खोत हे उदाहरण आहे. त्यांच्या संघटनेतून हकालपट्टीच्या निर्णयाला मोठा विलंब झाला. खासदार राजू शेट्टी यांना हा उशिरा सुचलेला शहाणपणा म्हणावा लागेल. चळवळी या शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या जीव असतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे असते. या सर्व घटकांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रेम केले होते, मात्र दोघेही आता एकमेकांशी संघर्ष करून संपून जातील, ही शेतकºयांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.बी. जी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटनास्वा िभमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोघांचे बोट धरून आम्ही शेतकरी चळवळीत आलो. पुणतांब्याचे शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मोडले. शेतकºयांचे आंदोलन मोडणाºयांबरोबर सदाभाऊ राहणे, ही गोष्टच न रुचणारी होती. त्यामुळे आजचा निर्णय संघटनेला घ्यावा लागला आहे. या गोष्टी घडायला नको होत्या.- विकास देशमुख, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सांगलीस्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कोणताही निर्णय घेत असताना संघटनेअंतर्गत लोकशाहीची पद्धत अवलंबिण्यात येते. त्यानुसार दोन्ही बाजूंनी विचार करून म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊन घेतलेला हा निर्णय आहे. संघटनेत राहायचे असेल, तर प्रत्येक कार्यकर्त्याला धोरणांची, विचारांची चौकट सांभाळावीच लागते.- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना