शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच पारडे जड झाल्याचे दिसत आहे.शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलेल्या फुटीरतावाद्यांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. सरकारमध्ये जाऊन मंत्रिपदावर विराजमान होताना शेतकरी चळवळीशी बेईमानी केली तर, त्याची फळे त्यांना भोगावी लागणारच. असाच प्रकार सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत घडल्याने शेतकरी नाराज होते. राजू शेट्टी यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आता त्यांनी संघटनेत लोकांना घेताना तपासून घ्यावे.- बाळासाहेब कुलकर्णी, संस्थापक नेते,शेतकरी संघर्ष परिषद, सांगलीस्वत:च्या हितासाठी संघटना चालविणाºयांचा फुगा आता फुटलेला आहे. हे कधी ना कधी होणार होतेच. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच मुळी तडजोडीच्या राजकारणावर अवलंबून आहे. सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचा मुद्दा हा व्यक्तिगत स्वार्थापोटीच्या भांडणाचा मुद्दा आहे. दोन नेत्यांमधील व्यक्तिगत वादातून ही घटना घडली आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी युती केली. त्यांच्या या युतीचा शेट्टींना कोणताच फायदा झाला नाही. त्यामुळे संघर्षाचा जन्म झाला. आंदोलनेसुद्धा स्वार्थी भावनेने केल्यामुळे आज त्यांच्या संघटनेवर ही वेळ आली आहे. भविष्यातही त्यांना अनेक परिणामांना सामारे जावे लागेल.- संजय कोले, नेते, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)चळवळीवरचा विश्वास : संपुष्टात येईलशरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे म्हणाले की, सदाभाऊंची हकालपट्टी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर, शेतकरी चळवळीची इतकी बदनामी झाली नसती. ज्यावेळी सदाभाऊंवर गंभीर आरोप होत होते, त्यावेळीही कारवाई झाली नाही. या कारवाईबरोबरच राज्य सरकारनेही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. असे लोक जर चळवळीत राहिले, तर शेतकºयांचा चळवळीवरील विश्वास उडून जाईल. सत्तेच्या मोहापायी चळवळीला वेठीस धरण्याचे काम सदाभाऊंकडून घडल्यामुळे आणि अनेकप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानेच ही कारवाई झाली आहे.शेतकरी चळवळीमध्ये धोकादायक माणसं ठेवल्यामुळे चळवळीचे नुकसान होते, याचे सदाभाऊ खोत हे उदाहरण आहे. त्यांच्या संघटनेतून हकालपट्टीच्या निर्णयाला मोठा विलंब झाला. खासदार राजू शेट्टी यांना हा उशिरा सुचलेला शहाणपणा म्हणावा लागेल. चळवळी या शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या जीव असतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे असते. या सर्व घटकांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रेम केले होते, मात्र दोघेही आता एकमेकांशी संघर्ष करून संपून जातील, ही शेतकºयांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.बी. जी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटनास्वा िभमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोघांचे बोट धरून आम्ही शेतकरी चळवळीत आलो. पुणतांब्याचे शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मोडले. शेतकºयांचे आंदोलन मोडणाºयांबरोबर सदाभाऊ राहणे, ही गोष्टच न रुचणारी होती. त्यामुळे आजचा निर्णय संघटनेला घ्यावा लागला आहे. या गोष्टी घडायला नको होत्या.- विकास देशमुख, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सांगलीस्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कोणताही निर्णय घेत असताना संघटनेअंतर्गत लोकशाहीची पद्धत अवलंबिण्यात येते. त्यानुसार दोन्ही बाजूंनी विचार करून म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊन घेतलेला हा निर्णय आहे. संघटनेत राहायचे असेल, तर प्रत्येक कार्यकर्त्याला धोरणांची, विचारांची चौकट सांभाळावीच लागते.- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना