शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सदाभाऊंचा मुद्दा गौण

By admin | Updated: June 12, 2017 23:42 IST

सदाभाऊंचा मुद्दा गौण

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी आंदोलनाच्या यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम होत आहे. संघटनेचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. सदाभाऊंचा मुद्दा आमच्यादृष्टीने गौण आहे. घात आल्यानंतर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल, तरच उगवण चांगली होईल, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत मारला. भाजपने कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली आहे. मात्र प्रत्यक्ष कृतीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपबद्दल अडीच वर्षांच्या सहवासानंतर आमची मते तयार झाली आहेत. त्यामुळे एक मागणी मान्य झाल्यावर आमची मते बदलणार नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुंबईतून परतलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी कार्यकर्त्यांसमवेत इस्लामपूर शहरातून रॅली काढली. पंचायत समितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसील कचेरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २ जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारची ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने हे आंदोलन पुढे सुरू राहिले. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे, हा आमचा आग्रह सरकारने मान्य केला. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बड्या कर्जदारांना लाभ न देण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम होते. आमचा लढा सामान्य शेतकऱ्यांसाठी असल्याने तसेच जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे यासाठी होता. नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील कमी दर, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी कर्जातच रहात होता. शेतीचा व्याप जेवढा मोठा, तेवढे कर्जही मोठे, या न्यायानेही या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा.ते म्हणाले की, सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी, ठेकेदार, आयकर भरणारे अशा विविध निकषांवर कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीत शेतीची मर्यादा काढून टाकली आहे. पीक कर्ज माफ करण्याचा प्रामुख्याने विचार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. सरकार कर्जमाफीसाठी तरतूद करेल. कर्जमाफीबाबतच्या कार्यवाहीसाठी एक-दोन दिवसात समिती गठित केली जाईल. २५ जुलैच्या आत कार्यवाही झाली नाही, तर २६ जुलैपासून पुन्हा आंदोलन करणार आहोत.स्वामिनाथन् आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबाव गट राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारच नाहीत, यासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे. १६ जूनरोजी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन चळवळीचा दबाव गट निर्माण करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.शेतकरी आंदोलनाचा काहींना प्रसाद!शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील काही नेत्यांना प्रसाद मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत जाणारा भाजीपाला पुरवठा रोखून रेल रोको, चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला.