शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सदाभाऊंचा मुद्दा गौण

By admin | Updated: June 12, 2017 23:42 IST

सदाभाऊंचा मुद्दा गौण

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी आंदोलनाच्या यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम होत आहे. संघटनेचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. सदाभाऊंचा मुद्दा आमच्यादृष्टीने गौण आहे. घात आल्यानंतर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल, तरच उगवण चांगली होईल, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत मारला. भाजपने कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली आहे. मात्र प्रत्यक्ष कृतीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपबद्दल अडीच वर्षांच्या सहवासानंतर आमची मते तयार झाली आहेत. त्यामुळे एक मागणी मान्य झाल्यावर आमची मते बदलणार नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुंबईतून परतलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी कार्यकर्त्यांसमवेत इस्लामपूर शहरातून रॅली काढली. पंचायत समितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसील कचेरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २ जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारची ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने हे आंदोलन पुढे सुरू राहिले. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे, हा आमचा आग्रह सरकारने मान्य केला. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बड्या कर्जदारांना लाभ न देण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम होते. आमचा लढा सामान्य शेतकऱ्यांसाठी असल्याने तसेच जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे यासाठी होता. नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील कमी दर, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी कर्जातच रहात होता. शेतीचा व्याप जेवढा मोठा, तेवढे कर्जही मोठे, या न्यायानेही या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा.ते म्हणाले की, सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी, ठेकेदार, आयकर भरणारे अशा विविध निकषांवर कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीत शेतीची मर्यादा काढून टाकली आहे. पीक कर्ज माफ करण्याचा प्रामुख्याने विचार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. सरकार कर्जमाफीसाठी तरतूद करेल. कर्जमाफीबाबतच्या कार्यवाहीसाठी एक-दोन दिवसात समिती गठित केली जाईल. २५ जुलैच्या आत कार्यवाही झाली नाही, तर २६ जुलैपासून पुन्हा आंदोलन करणार आहोत.स्वामिनाथन् आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबाव गट राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारच नाहीत, यासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे. १६ जूनरोजी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन चळवळीचा दबाव गट निर्माण करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.शेतकरी आंदोलनाचा काहींना प्रसाद!शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील काही नेत्यांना प्रसाद मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत जाणारा भाजीपाला पुरवठा रोखून रेल रोको, चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला.