शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST

अनिल बाबर : विट्यात पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

विटा : मान्सूनप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. खरीप पेरण्यांसाठी कुऱ्या तयार ठेवल्या आहेत. तशाच निवडणुकीसाठीही कुऱ्या तयार ठेवा, असे आवाहन आ. अनिल बाबर यांनी केले. त्याचवेळी मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय, असा टोलाही त्यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांना लगावला.विटा येथील शिवाजीनगर येथे आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी आ. बाबर बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ते म्हणाले की, विकासाचा अजेंडा व नागरीकरणाच्या उपाययोजना घेऊनच नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे आता मागील चूक न करता सर्वसामान्य नागरिकांची विटा नगरपरिषदेत सत्ता आणण्यासाठी विटेकरांनी साथ द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतली आहे. टेंभूचे पाणी येत्या दोन महिन्यात ढवळेश्वर तलावात सोडणार आहे.माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय? याचे उत्तर जनतेलाच दिले तर बरे होईल.यावेळी माजी उपसभापती सुहास बाबर, विनोद गुळवणी, सुखदेव शितोळे, तानाजी बाबर, राजू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, उत्तम चोथे, प्रवीण गायकवाड, अमर शितोळे, मकरंद गायकवाड, धनाजी बाबर, विनायक शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रासकर, शिवाजीराव हारूगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)विटा पालिकेत परिवर्तन अटळयावेळी सुहास बाबर यांनी विटा नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पालिकेची विरोधकांकडे सत्ता आहे. ते एका शहराचा विचार करतात, पण पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्याकडे ६५ गावांचे लोक येतात. कोणतीही तक्रार नाही. परंतु, नगरपरिषदेत दररोज तक्रारी आहेत. पंचायत समितीत निर्भयपणे माणूस जातो, तसा नगरपरिषदेत जात नाही. गत निवडणुकीत आमच्याकडे काहीही नसताना मिळेल त्यांना घेऊन निवडणूक लढविली. आता ही प्रगती व परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत परिवर्तन होईलच.