शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
2
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
3
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
4
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
5
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
6
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
7
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
8
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
9
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
10
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
11
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
12
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
13
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
14
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
15
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
16
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
17
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
18
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
19
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
20
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST

अनिल बाबर : विट्यात पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

विटा : मान्सूनप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. खरीप पेरण्यांसाठी कुऱ्या तयार ठेवल्या आहेत. तशाच निवडणुकीसाठीही कुऱ्या तयार ठेवा, असे आवाहन आ. अनिल बाबर यांनी केले. त्याचवेळी मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय, असा टोलाही त्यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांना लगावला.विटा येथील शिवाजीनगर येथे आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी आ. बाबर बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ते म्हणाले की, विकासाचा अजेंडा व नागरीकरणाच्या उपाययोजना घेऊनच नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे आता मागील चूक न करता सर्वसामान्य नागरिकांची विटा नगरपरिषदेत सत्ता आणण्यासाठी विटेकरांनी साथ द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतली आहे. टेंभूचे पाणी येत्या दोन महिन्यात ढवळेश्वर तलावात सोडणार आहे.माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय? याचे उत्तर जनतेलाच दिले तर बरे होईल.यावेळी माजी उपसभापती सुहास बाबर, विनोद गुळवणी, सुखदेव शितोळे, तानाजी बाबर, राजू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, उत्तम चोथे, प्रवीण गायकवाड, अमर शितोळे, मकरंद गायकवाड, धनाजी बाबर, विनायक शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रासकर, शिवाजीराव हारूगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)विटा पालिकेत परिवर्तन अटळयावेळी सुहास बाबर यांनी विटा नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पालिकेची विरोधकांकडे सत्ता आहे. ते एका शहराचा विचार करतात, पण पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्याकडे ६५ गावांचे लोक येतात. कोणतीही तक्रार नाही. परंतु, नगरपरिषदेत दररोज तक्रारी आहेत. पंचायत समितीत निर्भयपणे माणूस जातो, तसा नगरपरिषदेत जात नाही. गत निवडणुकीत आमच्याकडे काहीही नसताना मिळेल त्यांना घेऊन निवडणूक लढविली. आता ही प्रगती व परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत परिवर्तन होईलच.