शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजप पाठिंब्याबाबत सदाभाऊ सहज बोलले!

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

राजू शेट्टी : रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची दोन दिवसात बैठक

सांगली : जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहज बोलताना, भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. येत्या दोन दिवसात सदाभाऊ खोत आणि रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची बैठक घेऊन, पाठिंब्याबाबत निर्णय घेणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत रयत विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंंबा कोणाला द्यायचा, याबाबत ठरलेले नाही. आपला पाठिंंबा गुलदस्त्यातच आहे. सदाभाऊ खोत यांनी बोलता-बोलता, भाजपला पाठिंंबा असे म्हटले असेल. मात्र रयत विकास आघाडीत असणाऱ्या सर्व घटकांशी एकत्रित चर्चा करूनच निर्णय घेणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दि. २१ मार्च रोजी होणार आहेत. पदाधिकारी निवडीलाही वेळ असल्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. आमची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. मात्र त्यामध्ये पाठिंब्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. बैठकीस सदाभाऊ खोत उपस्थित नव्हते. या रयत विकास आघाडीत विविध पक्ष व संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळे पाठिंब्याबाबत निर्णय घेताना या सर्वांशी चर्चा करावी लागेल, असेही शेट्टी म्हणाले. भाजप की काँग्रेस, यापैकी काहीही ठरलेले नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेणार आहोत. उमेदवार, सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. ज्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, तो पक्ष जनतेच्या विकासाला महत्त्व देणारा असला पाहिजे. जनतेने विकासाच्या मुद्यावर आमच्या गटाला यश दिले आहे. या मतदारांची आम्ही कधीही निराशा करणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सदाभाऊ आमचेच, तात्त्विक मतभेद : शेट्टी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहेत. ते आमच्याबरोबरच असून केवळ तात्त्विक काही मतभेद असतील, तर आम्ही एकत्र बसून ते मिटविणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही पुन्हा एकजुटीने लढणार आहोत. कोणी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते होणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंधच आहे, असे मतही खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.