शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पाठिंब्याबाबत सदाभाऊ सहज बोलले!

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

राजू शेट्टी : रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची दोन दिवसात बैठक

सांगली : जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहज बोलताना, भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. येत्या दोन दिवसात सदाभाऊ खोत आणि रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची बैठक घेऊन, पाठिंब्याबाबत निर्णय घेणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत रयत विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंंबा कोणाला द्यायचा, याबाबत ठरलेले नाही. आपला पाठिंंबा गुलदस्त्यातच आहे. सदाभाऊ खोत यांनी बोलता-बोलता, भाजपला पाठिंंबा असे म्हटले असेल. मात्र रयत विकास आघाडीत असणाऱ्या सर्व घटकांशी एकत्रित चर्चा करूनच निर्णय घेणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दि. २१ मार्च रोजी होणार आहेत. पदाधिकारी निवडीलाही वेळ असल्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. आमची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. मात्र त्यामध्ये पाठिंब्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. बैठकीस सदाभाऊ खोत उपस्थित नव्हते. या रयत विकास आघाडीत विविध पक्ष व संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळे पाठिंब्याबाबत निर्णय घेताना या सर्वांशी चर्चा करावी लागेल, असेही शेट्टी म्हणाले. भाजप की काँग्रेस, यापैकी काहीही ठरलेले नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेणार आहोत. उमेदवार, सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. ज्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, तो पक्ष जनतेच्या विकासाला महत्त्व देणारा असला पाहिजे. जनतेने विकासाच्या मुद्यावर आमच्या गटाला यश दिले आहे. या मतदारांची आम्ही कधीही निराशा करणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सदाभाऊ आमचेच, तात्त्विक मतभेद : शेट्टी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहेत. ते आमच्याबरोबरच असून केवळ तात्त्विक काही मतभेद असतील, तर आम्ही एकत्र बसून ते मिटविणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही पुन्हा एकजुटीने लढणार आहोत. कोणी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते होणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंधच आहे, असे मतही खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.