शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेने ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By admin | Updated: March 9, 2016 00:58 IST

नवा राजकीय रंग : राष्ट्रवादी नेत्यांना जवळ करून भाजपवर दबावतंत्राचे राजकारण

अशोक पाटील -इस्लामपूर --गेल्या काही महिन्यांपासून भाजप कोअर कमिटीकडून घटकपक्षांना मंत्रीपद देण्याचे फक्त आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर एकच रामबाण उपाय म्हणून, पुणे येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या जवळ बसून खोत यांनी सत्ताधारी भाजपला चपराक दिली आहे. यामागे मंत्रिपदासाठी भाजपवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे, मात्र सदाभाऊंच्या या भूमिकेवर स्वाभिमानी पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आह. लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना केंद्रात कृषिमंत्री होण्याचे स्वप्न पडले होते, तर माढा लोकसभा मतदार संघात चुरशीने निवडणूक लढविलेल्या सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार, या चर्चेला उधाण आले होते. पण या दोघांच्याही स्वप्नाचा भाजपने चुराडा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना मंत्रीपद देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्वाभिमानी संघटनेतील कार्यकर्ते सांगत आहेत. परंतु याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे दोन वर्षात शांत राहिलेल्या या संघटनेला आता पुन्हा शेतकऱ्यांचा कळवळा येत आहे. या त्यांच्या कळवळ्याची दखल त्यांच्याच तालुक्यात असलेले आमदार जयंत पाटील यांनी घेतली नाही. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानीचा आलेख खालावला आहे.एकंदरीत ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मोठे झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महाआघाडीतील पक्षांबरोबर असताना, पुणे येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजितदादा पवार यांच्या जवळ बसलेल्या सदाभाऊ खोत यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यांनी तात्काळ मुंबई येथे घटकपक्षांची बैठक बोलावल्याचे समजते. यावरूनच स्वाभिमानीने राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन भाजपवर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे. एकीकडे दबावतंत्राचे हे राजकारण रंगले असताना स्वाभिमानी पक्षात या नव्या भूमिकेमुळे अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. शेतकरी चळवळीतून मोठे झालेले सदाभाऊ खोत हे साखरसम्राटांना विकले गेले आहेत. ते बनावट शेतकरी नेते आहेत. सत्ता, संपत्तीच्या लालसेपोटी शेतकऱ्यांचा कसा विश्वासघात करावा, हे त्यांच्याकडून शिकावे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भाजपवर दबाव आणण्याची खेळी खोत यांनी केली आहे.बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा शेतकरी संघटना.स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत आणि भाजपचे शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून जयंत पाटील आणि संजय पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून सदाभाऊ तसेच घटक पक्षांनी केलेली दबावाची खेळी राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.