शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.ने शहरे जोडली, गावे मात्र अद्याप नकाशाबाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यभरात बहुतांश मार्गांवर एस. टी. धावू लागली तरी ग्रामीण भागात मात्र फेऱ्या ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यभरात बहुतांश मार्गांवर एस. टी. धावू लागली तरी ग्रामीण भागात मात्र फेऱ्या सुरु झालेल्या नाहीत. ग्रामस्थांना अजूनही वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.

कोरोनाच्या वेगवेगळ्या स्तरांनुसार एस. टी. सेवा सुरु करण्यास शासनाने सशर्त परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा मुख्यालयापासून तालुक्यांदरम्यान एस. टी. धावू लागली आहे. सांगलीतून सर्व तालुक्यांना प्रत्येक तासाला एस. टी. उपलब्ध आहे. तासगाव, वाळवा, इस्लामपूर, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, शिराळा, आटपाडी, पलूस येथूनही बससेवा सुरु झाली आहे. मात्र, यामध्ये ग्रामीण भागाचा समावेश नाही. या मार्गांवर असणाऱ्या छोट्या गावांना एस. टी. सेवेचा लाभ मिळतो. याचवेळी मुख्य रस्त्यावर नसणाऱ्या गावांना मात्र काळी-पिवळीशिवाय पर्याय नाही. सांगली-मिरजेलगतच्या काही गावांना शहरी बसच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत, पण त्यादेखील अत्यंत मोजक्या आहेत.

बॉक्स

गावाकडे जाण्यासाठी काळी-पिवळीचाच आधार

शहरातून गावाकडे जाण्यासाठी सध्यातरी वडापचाच आधार आहे. वैद्यकीय उपचार किंवा सरकारी कार्यालयातील कामासाठीचा प्रवास वडापने करावा लागत आहे.

बॉक्स

एस. टी.ची धाव दूरवर, पण शहरांपुरतीच

- सध्या सांगलीतून प्रत्येक तालुक्याला तासागणिक एस. टी. आहे, पण ग्रामीण भागाला फायदा नाही.

- सांगलीतून पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांसाठीही गाड्या धावताहेत.

- जत, शिराळ्यासारख्या लांबच्या शहरांना जाता येते, पण जवळच्या सलगरे, हिंगणगावला मात्र गाड्या नाहीत.

पॉईंटर्स

आगारातील एकूण बसेस ७१६

सध्या सुरु असलेल्या बसेस ३८५

सध्या सुरु असलेल्या फेऱ्या ७५०

कोट

खेडेगावांनी काय घो़डे मारलेय?

वैद्यकीय उपचारांसाठी सांगली, मिरजेला जावे लागते, पण एस. टी. नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागतो. प्रसंगी खासगी वाहन भाड्याने घ्यावे लागते. एस. टी.ने काही महत्त्वाच्या व मोठ्या गावांना फेऱ्या सुरु कराव्यात.

- प्रल्हाद माळी, प्रवासी, सलगरे

गावातून सांगलीला एस. टी. सुरु नाही. दुचाकीने विट्याला जातो, तेथून एस. टी.ने सांगली, मिरजेला जातो. संध्याकाळी परततानाही हीच कसरत करावी लागते. एस. टी.ने खेडेगावांसाठी सकाळी व संध्याकाळी किमान एक फेरी सुरु करावी.

- युवराज जाधव, नेवरी

ग्रामीण भागातून प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. एस. टी.ला प्रतिकिलोमीटर ४५ ते ५० रुपये खर्च येतो, सध्याचे उत्पन्न मात्र २२ रुपये आहे. सांगलीतून प्रत्येक तालुक्याला फेऱ्या सुरु आहेत.

- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, सांगली