शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

नरेंद्र मोदींवर ‘आरएसएस’चा कंट्रोल

By admin | Updated: January 18, 2016 00:36 IST

कुमार सप्तर्षी : देश वाचवायचा असेल, तर नव्याने राजकीय सुरुवात करण्याची गरज

इस्लामपूर : लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मते दिली, ते पंतप्रधान झाले़ मात्र त्यांच्यावर ‘आरएसएस’चा कंट्रोल आहे़ सध्या लोकांना संमोहित करून पुरोगामी विचारांच्या लोकांचे मुडदे पाडले जात आहेत, हे सर्वच राजकीय पक्षांना मोठे आव्हान आहे. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वांनाच नव्याने राजकीय सुरुवात करावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ़ कुमार सप्तर्षी यांनी दिला़ राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘माझे आठवणीतील बापू’ या विषयावर बोलत होते़ याप्रसंगी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि़ प़ अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, विश्वासराव पाटील उपस्थित होते.स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी गोमांस, गोहत्या यासारखे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लोकशाही हवी का वेदशाही हवी? असा सवाल करीत, योगासने करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कमी केले जात आहे, असा आरोप सप्तर्षी यांनी केला़ ते म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी मधल्या दलालांना बाजूला करून थेट विठ्ठलाशी नाते जोडणारी अध्यात्म क्रांती केली़ त्यातून सर्व जातीत संत तयार झाले. आपण ‘राजकीय लाभार्थी’ होऊ नका़ आपले जीवन ‘हंगामी’ आहे, याची सदैव जाणीव ठेवा आणि जेवढ्या गरजा, तेवढेच मिळवा़ मोदींच्या ‘कॉँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा समाचार घेताना ‘महात्मा गांधींनी घालून दिलेला विचार, संस्कृती कशी जाईल? आणि ती गेली तर देश म्हणून आपण एकत्र राहू का? असा सवाल त्यांनी केला़ राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़ पपाली कचरे, प्रा. शामराव पाटील, आबासाहेब देशमुख, विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, बी. एस़ पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, मनोज शिंदे, बी. डी़ पवार, बाबासाहेब मुळीक, किसन जानकर, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, सदाशिव पवार, माणिकदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)साधेपणा भावला...बापूंच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा साधेपणा मला भावला़ त्यांनी आयुष्यभर ‘सामान्य माणसा’चे जीवन सुखी करण्यासाठी अपार कष्ट घेतले, या शब्दात सप्तर्षींनी राजारामबापूंना आदरांजली अर्पण केली.