शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नावावर ५९ हजार कोटींचे कर्ज: रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:28 IST

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते ...

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावावर सरकार कर्ज उचलत असताना, या विषयावर कोणत्याच पक्षाचे आमदार व खासदार काहीच बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्येला सरकारप्रमाणे या देशातील सर्व आमदार, खासदारही तितकेच जबाबदार आहेत. राजकीय पक्ष, आमदार आणि खासदारांचे कॉपोर्रेट क्षेत्राशी लागेबांधे असल्याने ते गप्प आहेत.यासाठी आता शेतकºयांमध्ये जागृती निर्माण करून लवकरच लढा उभा केला जाईल. अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे कृषिमंत्री, अर्थमंत्री व पंतप्रधान मोठ्या आवाजात सांगतात. पण हा सर्व पैसा कॉपोर्रेट क्षेत्राकडे जात आहे. कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीची ही योजना राबविण्यात आली आहे. शेतकºयांच्या बाजूचे कायदे मोडण्याचे काम सरकार करीत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर सर्वत्र अराजकता माजण्याची भीती आहे.बेडग (ता. मिरज) येथील महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस खासगी राष्टÑीयीकृत बँकेतील अधिकारी आहेत. बँकेने कर्ज वसुलीचा तगादा लावल्याने नागगोजे यांनी शेतातच गळफास घेतला. याप्रकरणी संबंधित बँक अधिकाºयावर येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल करावा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, डी. जी. माळी उपस्थित होते....तर सरकारचे तुकडे करूरघुनाथदादा पाटील म्हणाले की, भ्रष्ट साखर कारखानदारांसाठी तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी, अशी भूमिका घेण्याचा उद्योग सुरू आहे. पण याला आमच्या संघटनेचा विरोध राहील. याप्रश्नी मंत्रिमंडळात असलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत गप्प का आहेत? कोणत्याही परिस्थितीत ऊस बिलाचे तुकडे पडू देणार नाही, प्रसंगी सरकार आणि साखर कारखानदारांची घमेंड उतरवली जाईल. एफआरपीचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सरकारचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.