शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

शेतकऱ्यांच्या नावावर ५९ हजार कोटींचे कर्ज: रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:28 IST

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते ...

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावावर सरकार कर्ज उचलत असताना, या विषयावर कोणत्याच पक्षाचे आमदार व खासदार काहीच बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्येला सरकारप्रमाणे या देशातील सर्व आमदार, खासदारही तितकेच जबाबदार आहेत. राजकीय पक्ष, आमदार आणि खासदारांचे कॉपोर्रेट क्षेत्राशी लागेबांधे असल्याने ते गप्प आहेत.यासाठी आता शेतकºयांमध्ये जागृती निर्माण करून लवकरच लढा उभा केला जाईल. अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे कृषिमंत्री, अर्थमंत्री व पंतप्रधान मोठ्या आवाजात सांगतात. पण हा सर्व पैसा कॉपोर्रेट क्षेत्राकडे जात आहे. कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीची ही योजना राबविण्यात आली आहे. शेतकºयांच्या बाजूचे कायदे मोडण्याचे काम सरकार करीत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर सर्वत्र अराजकता माजण्याची भीती आहे.बेडग (ता. मिरज) येथील महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस खासगी राष्टÑीयीकृत बँकेतील अधिकारी आहेत. बँकेने कर्ज वसुलीचा तगादा लावल्याने नागगोजे यांनी शेतातच गळफास घेतला. याप्रकरणी संबंधित बँक अधिकाºयावर येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल करावा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, डी. जी. माळी उपस्थित होते....तर सरकारचे तुकडे करूरघुनाथदादा पाटील म्हणाले की, भ्रष्ट साखर कारखानदारांसाठी तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी, अशी भूमिका घेण्याचा उद्योग सुरू आहे. पण याला आमच्या संघटनेचा विरोध राहील. याप्रश्नी मंत्रिमंडळात असलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत गप्प का आहेत? कोणत्याही परिस्थितीत ऊस बिलाचे तुकडे पडू देणार नाही, प्रसंगी सरकार आणि साखर कारखानदारांची घमेंड उतरवली जाईल. एफआरपीचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सरकारचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.