शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दरात ३00 रुपयांनी घसरण

By admin | Updated: September 6, 2016 23:46 IST

कोठ्याच्या बंधनाने साखर उद्योगात अस्वस्थता : २७00 ते २८00 पर्यंत दर कोसळण्याची शक्यता

प्रकाश पाटील -- कोपार्डे --हंगाम २0१५-१६ मध्ये देशात साखरेचे बंपर उत्पादन झाले. यामुळे साखरेचे दर १९00 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. केंद्राने साखर उद्योग अडचणीत येऊ नये म्हणून साखर निर्यातीचे धोरण जाहीर केले आणि साखरेचे दर वाढू लागले. साखरेचे एक्स फॅक्टरी दर प्रतिक्विंटल ३५00 ते ३८00 वर पोहोचले असताना शासनाने व्यापाऱ्यांबरोबर कारखान्यांवरही साखर साठ्याबाबत बंधन आणल्याने साखरेच्या दरात ३00 ते ४00 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली आहे.गतवर्षी दुष्काळाला राज्याला सामोरे जावे लागले. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतीच्या सिंचनासाठीच्या पाण्यावर उपसाबंदी लावली. यामुळे या हंगामात उसाचे उत्पादन घटणार असल्याने साखर उत्पादनही घटणार आहे. याचबरोबर शासनाने साखरेचे दर स्थिर राहावेत व साखर कारखान्यांना उत्पादन खर्चाएवढा दर मिळावा म्हणून साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदानही जाहीर केले. या सर्वांचा परिणाम साखरेचे दर जानेवारी २0१६ पासून वाढू लागले. आॅक्टोबर-नोव्हेंबर २0१५ मध्ये १९00 रुपये प्रतिक्विंटल असणारे साखरेचे दर चार दिवसांपूर्वी ३५00 ते ३८00 रुपये होते; पण केंद्र शासनाने हे दर आणखी वाढू नयेत म्हणून व्यापाऱ्यांबरोबर साखर कारखान्यांच्या साखरसाठ्यावरही नियंत्रण आणले आहे. साखर कारखान्यांकडे सप्टेंबर महिन्यात ३४ टक्के, तर आॅक्टोबर महिन्यात २७ टक्क्यांवर साठा असता कामा नये, असे निर्बंध करण्याचे जाहीर करताच साखरेच्या दरात दोन दिवसांत प्रचंड घसरण झाली.चार दिवसांत ज्या-ज्या साखर कारखान्यांची साखर विक्री टेंडर झाली, त्यांची साखर ३१00 ते ३२00 रुपये विक्री करण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येत्या काही दिवसांत हाच दर २७00 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येण्याची शक्यता साखर उद्योगातून वर्तविण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा धरसोड धोरणांचा बळी साखर उद्योग ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. बाजारात आजही साखर ४0 ते ४२ रुपये किलोकेंद्र शासन जनतेला साखरेच्या दराचा त्रास होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तू कायद्याचा वापर करून दर नियंत्रणात ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न क रते; मात्र याचा तोटा कारखाने व जनतेलाच जास्त होताना दिसतो. सध्या कारखान्यांना मिळणारा दर व जनतेला मिळणाऱ्या घाऊक बाजारातील साखरेच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांचा फरक आहे. सध्या कारखानदारांना ३१00 ते ३२00 रुपये दराने साखर दर मिळत असताना बाजारातील साखरेचे दर मात्र कमी होताना दिसत नाहीत. याचा फायदा व्यापारीच उठवत असल्याचे चित्र दिसते.