शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पालिकेला बसणार २२३ कोटींचा फटका

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता या प्रमुख करांच्या वसुलीची गाडी खाचखळग्यांतून जात आहे.

शीतल पाटील -सांगली  सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडणाऱ्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला आता जमा-खर्चाचे गणित जुळविताना नाकीनऊ आले आहे. एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता या प्रमुख करांच्या वसुलीची गाडी खाचखळग्यांतून जात आहे. नोव्हेंबरअखेर पालिका तिजोरीत ७९.८५ कोटींचा कर जमा झाला आहे, तर वर्षअखेरीपर्यंत पालिकेला ठेकेदारांची बिले, कर्मचाऱ्यांचे वेतन, शासकीय योजनेतील हिस्सा यापोटी तब्बल २८४ कोटी २३ लाखांची गरज भासणार आहे. उर्वरित चार महिन्यांत आणखी ६० कोटींची भर पडेल. त्यामुळे पालिकेला यंदा २२३. ६५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे. २०१४-१५ चे अंदाजपत्रक सादर करताना प्रशासन, स्थायी समिती आणि महासभेने अनेक स्वप्ने रंगविली होती. पण या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. एलबीटी हे उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. पण एलबीटीलाच व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने त्याची वसुलीही जेमतेम होते. एचसीएल बंद झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टीची बिले वेळेत देता आलेली नाहीत. आता कुठे घरपट्टीची बिले नागरिकांना दिली आहेत. त्याची वसुली मार्चपर्यंत होणार आहे.तर पाणीपट्टीची सहा महिन्यांची बिले काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत घरपट्टीतून ६.५५ कोटी (२८ टक्के), तर पाणीपट्टीतून ५.०५ कोटी (१८ टक्के) कराची वसुली झाली आहे. एलबीटीतून ४०.३९ (४५ टक्के), मालमत्ता ०.५८ कोटी (१४ टक्के), इतर ११.५२ कोटी (५५ टक्के) असे एकूण ७९.८५ कोटी रुपये जमा झाले आहेत, तर नोव्हेंबरअखेर ७९.२५ कोटी रुपये खर्च झाले असून, तिजोरीत ६० लाख रुपये शिल्लक आहेत. कर वसुलीची हीच गती कायम राहिल्यास मार्चपर्यंत ६०.५७ कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज मुख्य लेखाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, घरकुलसह विविध शासकीय योजनेतून कामे सुरू आहेत. या योजनेसाठी पालिकेचा हिस्सा द्यावा लागणार आहे. हा आकडा सुमारे १८४ कोटी रुपये इतका आहे. त्यात ठेकेदारांची २३ कोटींची थकित बिले, कर्मचाऱ्यांचे वेतन व बांधील खर्चाचे ५९.२८ कोटी, शासन उपकर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, त्यांचा फरक असे सुमारे २८४.२३ कोटी रुपये मार्चअखेरीस द्यावे लागणार आहेत. तसेच मार्चपर्यंत ६०.५७ कोटींची वसुली होईल. त्यामुळे वर्षअखेर पालिकेवर २२३.६५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय योजना, मक्तेदारांच्या थकित बिलासोबतच कर्मचाऱ्यांचे पगार होणेही अशक्य बनणार आहे. महापालिका प्रशासनासमोर कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.महापालिकेचा लेखाजोखाविभाग उद्दिष्टवसूल टक्केवारीघरपट्टी२३.३६६.५५२८ %एलबीटी९०.०१४०.३९४५%मालमत्ता४.२४०.५८१४%अनुदान९.२७८.२३७४%पाणीपट्टी२७.६२५.०५१८%इतर२०.८७११.५२५५%एकूण१७५.३७७९.८५४५%