शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

ऊस दराच्या आंदोलनात मनसे रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

मुंबईत बैठक : रघुनाथ पाटील- राज ठाकरे भेटीत निर्वाळा

इस्लामपूर : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी मुंबईतून भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना दिली. आज सकाळी ११ वाजता मुंबई (दादर) येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरे व शेतकरी संघटनेचे नेते व देशव्यापी ‘सिफा’ संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची भेट झाली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीतील चर्चेत राज ठाकरे यांना पाटील यांनी राज्यातील साखर कारखानदारी, उसाची शेती आणि ऊसदराचे आंदोलन याची सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली. राज ठाकरे यांनी राज्यातील साखरसम्राट व शासनाकडून होणाऱ्या अन्यायाबाबत संताप व्यक्त करुन दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे. शासनाची व कारखानदारांची निमंत्रणे झुगारुन दिली पाहिजेत. उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी २0 टक्के साखर जनतेसाठी तर ८0 टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.सुमारे तासाभराच्या या बैठकीत ठाकरे यांनी यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, असेही त्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले. या चर्चेवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कार्यालयीन चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)वसगडेच्या कार्यक्रमाला राज ठाकरे येणारयेत्या ११ नोव्हेंबर रोजी वसगडे (जि. सांगली) येथे ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराने धारातिर्थी पडलेल्या चंद्रकांत नलवडे यांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेला उपस्थित राहण्याचेही राज ठाकरे यांनी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे.ऊसाला योग्य दर दिलाच पाहिजे