शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराच्या आंदोलनात मनसे रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

मुंबईत बैठक : रघुनाथ पाटील- राज ठाकरे भेटीत निर्वाळा

इस्लामपूर : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी मुंबईतून भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना दिली. आज सकाळी ११ वाजता मुंबई (दादर) येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरे व शेतकरी संघटनेचे नेते व देशव्यापी ‘सिफा’ संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची भेट झाली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीतील चर्चेत राज ठाकरे यांना पाटील यांनी राज्यातील साखर कारखानदारी, उसाची शेती आणि ऊसदराचे आंदोलन याची सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली. राज ठाकरे यांनी राज्यातील साखरसम्राट व शासनाकडून होणाऱ्या अन्यायाबाबत संताप व्यक्त करुन दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे. शासनाची व कारखानदारांची निमंत्रणे झुगारुन दिली पाहिजेत. उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी २0 टक्के साखर जनतेसाठी तर ८0 टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.सुमारे तासाभराच्या या बैठकीत ठाकरे यांनी यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, असेही त्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले. या चर्चेवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कार्यालयीन चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)वसगडेच्या कार्यक्रमाला राज ठाकरे येणारयेत्या ११ नोव्हेंबर रोजी वसगडे (जि. सांगली) येथे ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराने धारातिर्थी पडलेल्या चंद्रकांत नलवडे यांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेला उपस्थित राहण्याचेही राज ठाकरे यांनी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे.ऊसाला योग्य दर दिलाच पाहिजे