शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाळवा तालुक्यात नदीकाठाचे स्थलांतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या. चांदोली आणि ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या. चांदोली आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी वारणा आणि कृष्णा नदीकाठाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिकुर्डे आणि ऐतवडे खुर्द येथील नदीकाठच्या परिसरातील ग्रामस्थांचे आणि जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

पावसाच्या संततधारेमुळे सगळे जनजीवन ठप्प झाले होते. बहे आणि बोरगाव येथील बंधारे पाण्याखाली गेले होते. कोयनेतील पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी बहे, रेठरे हरणाक्ष आणि ताकारी येथील पुलावरील पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खालीच होती. मात्र, तरीही सतत पडणारा पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तहसीलदार सबनीस म्हणाले, ऐतवडे खुर्द येथील पर्बतवाडी, चिकुर्डे येथील भोसलेवाडीच्या काही कुटुंबांचे आणि जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कणेगाव, भरतवाडी, बहे, बोरगाव, ताकारी परिसरात भेटी देऊन येथील ग्रामस्थांनाही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांच्यासह ग्रामसुरक्षा समित्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोट

वाळवा तालुक्यात सततचा पडणारा पाऊस आणि चांदोली व कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवसांत पाणी पातळीत कमालीची वाढ होईल. अशा वेळी नागरिकांनी पूरसदृश पाणी पाहण्यासाठी नदीपात्राकडे जाऊ नये.

- रवींद्र सबनीस, तहसीलदार, इस्लामपूर