शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

घाटमाथ्यावरील अग्रणी नदी कृष्णेच्या पाण्याने खळाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:37 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर हरितक्रांतीच्या पर्वाला सुरूवात झाली असून, ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर हरितक्रांतीच्या पर्वाला सुरूवात झाली असून, टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाईच्या पाण्याने दुष्काळी भागातील ‘अग्रणी’ नदी खळाळली आहे. त्यामुळे या भागातील बळीराजा चांगलाच सुखावला असून, दुष्काळी घाटमाथ्याला आता ‘टेंभू’ने चांगलाच आधार दिला आहे.भूड (ता. खानापूर) येथील टेंभूच्या पाचव्या टप्प्यातून बलवडी (खा.) जवळ अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पडणाºया कृष्णेच्या पाण्याने अग्रणी नदीपात्रातील सिध्देवाडीपर्यंतचे २५ हून अधिक बंधारे तुडुंब भरून तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावापर्यंतचा पाण्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्यावर लुप्त झालेली अग्रणी नदी लोकसहभाग आणि शासनयंत्रणेद्वारे पुन्हा पुनरुजीवित झाली. शासनयंत्रणा आणि लोकसहभागाचा सुरेख संगम तयार करून अग्रणीचे खोलीकरण व रूंदीकरण करून घेण्यात आले.खानापूर तालुक्याच्या हद्दीत २० कि.मी., तासगाव तालुक्यात १७, तर कवठेमहांकाळ तालुक्यात २४ कि.मी. नदीपात्र असलेल्या या अग्रणी नदीवर सध्या ४७ सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले. टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून आलेल्या पाण्यातून बलवडी (खा.) हद्दीतील अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील सर्व बंधारे भरून हे पाणी तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावात दाखल झाले आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील या नदीकाठावरील अनेक गावांतील बळीराजा तर सुखावला आहेच, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर होऊ लागली आहे. त्यामुळे टेंभूच्या माध्यमातून दुष्काळी खानापूरच्या या घाटमाथ्यावर आता हरितक्रांतीची बीजे रोवली जाणार आहेत.‘अग्रणी’ची अख्यायिकाखानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. अगस्ति ऋषी येथून कृष्णा नदीस रोज स्नानासाठी जात होते. हा परिसर दंडकारण्यात मोडतो. अगस्ति ऋषींना प्रसन्न होऊन कृष्णा नदी तामखडीपर्यंत आली. परंतु, अगस्ति ऋषींना या गोष्टीचा गर्व झाल्याने, कृष्णा नदी स्वस्थानी निघून गेली. तेथूनच उत्तरेस अग्रणी नदी प्रकट झाली, अशी अख्यायिका सांगितली जाते. आता टेंभूच्या माध्यमातून हीच कृष्णा नदी पुन्हा अग्रणीतून घाटमाथ्यावरील बळीराजाला संजीवनी देण्यासाठी वाहू लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.