शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावरील अग्रणी नदी कृष्णेच्या पाण्याने खळाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:37 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर हरितक्रांतीच्या पर्वाला सुरूवात झाली असून, ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर हरितक्रांतीच्या पर्वाला सुरूवात झाली असून, टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाईच्या पाण्याने दुष्काळी भागातील ‘अग्रणी’ नदी खळाळली आहे. त्यामुळे या भागातील बळीराजा चांगलाच सुखावला असून, दुष्काळी घाटमाथ्याला आता ‘टेंभू’ने चांगलाच आधार दिला आहे.भूड (ता. खानापूर) येथील टेंभूच्या पाचव्या टप्प्यातून बलवडी (खा.) जवळ अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पडणाºया कृष्णेच्या पाण्याने अग्रणी नदीपात्रातील सिध्देवाडीपर्यंतचे २५ हून अधिक बंधारे तुडुंब भरून तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावापर्यंतचा पाण्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्यावर लुप्त झालेली अग्रणी नदी लोकसहभाग आणि शासनयंत्रणेद्वारे पुन्हा पुनरुजीवित झाली. शासनयंत्रणा आणि लोकसहभागाचा सुरेख संगम तयार करून अग्रणीचे खोलीकरण व रूंदीकरण करून घेण्यात आले.खानापूर तालुक्याच्या हद्दीत २० कि.मी., तासगाव तालुक्यात १७, तर कवठेमहांकाळ तालुक्यात २४ कि.मी. नदीपात्र असलेल्या या अग्रणी नदीवर सध्या ४७ सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले. टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून आलेल्या पाण्यातून बलवडी (खा.) हद्दीतील अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील सर्व बंधारे भरून हे पाणी तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावात दाखल झाले आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील या नदीकाठावरील अनेक गावांतील बळीराजा तर सुखावला आहेच, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर होऊ लागली आहे. त्यामुळे टेंभूच्या माध्यमातून दुष्काळी खानापूरच्या या घाटमाथ्यावर आता हरितक्रांतीची बीजे रोवली जाणार आहेत.‘अग्रणी’ची अख्यायिकाखानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. अगस्ति ऋषी येथून कृष्णा नदीस रोज स्नानासाठी जात होते. हा परिसर दंडकारण्यात मोडतो. अगस्ति ऋषींना प्रसन्न होऊन कृष्णा नदी तामखडीपर्यंत आली. परंतु, अगस्ति ऋषींना या गोष्टीचा गर्व झाल्याने, कृष्णा नदी स्वस्थानी निघून गेली. तेथूनच उत्तरेस अग्रणी नदी प्रकट झाली, अशी अख्यायिका सांगितली जाते. आता टेंभूच्या माध्यमातून हीच कृष्णा नदी पुन्हा अग्रणीतून घाटमाथ्यावरील बळीराजाला संजीवनी देण्यासाठी वाहू लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.